शहरं
Join us  
Trending Stories
1
3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story
2
वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटना घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक
3
५० खोके हे सत्यच, संतोष बांगरांना एकनाथ शिंदेंनी ५० कोटी दिले; भाजपा आमदाराचा खळबळनजक दावा
4
लग्नघरात शोककळा, वराच्या कारखाली चिरडून वडिलांचा मृत्यू, वधूचा भाऊ गंभीर जखमी  
5
Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी
6
रात्री ११:४५ वाजता, चेन तुटली, अंधारामुळे 'ती' घाबरली; तरुणीसोबत रॅपिडो रायडरने केलं 'असं' काही...
7
अमेरिका ठरला स्वत:च्याच ट्रेनिंगचा बळी, व्हाईट हाऊस गोळीबार करणाऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा
8
दीपिका पादुकोण कोणत्या कंपनीची आहे मालक; अचानक का चर्चेत आलंय तिचं नाव?
9
नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच म्हणतोय, “मला मतदान करू नका!”, नेमकं कारण काय?
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
बिहार निवडणुकीतील घात कोणी केला? आरजेडीने चौकशी सुरू केली; कठोर कारवाई करण्याची तयारी
12
भावोजींसोबत मेहुणी फरार, त्रस्त पित्याची पोलिसांत तक्रार; म्हणाले, ‘लाखभर रुपयेही सोबत नेले’
13
दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?
14
निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!
15
Kolhapur: रक्षाविसर्जनावरुन स्मशानभूमीत तिरडीच्या काठ्या काढून नातेवाइकांत डोके फुटेपर्यंत हाणामारी, इचलकरंजीचे चौघे जखमी
16
इंजिनिअर जावई शोधला, लग्नात ६० लाखांचा खर्च; हुंड्यासाठी छळ, लेकीने ६ महिन्यांत आयुष्य संपवलं
17
'या' EV कारवर भारतीय ग्राहक तुटून पडले; कंपनीने दर 10 मिनिटाला विकली एक इलेक्ट्रिक SUV
18
नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार...
19
वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो
20
"टेन्शनमुळे त्याच्या छातीत दुखायला लागलं...", पलाश मुच्छलच्या डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन मराठा आंदोलन, गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन लाठीचार्ज; नाना पटोलेंचा आरोप

By संजय तिपाले | Updated: September 6, 2023 16:21 IST

ओबीसींच्या वाट्याला जाल तर हात भाजून निघेल...

गडचिरोली : मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन जालन्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु झाले तर गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यावर लाठीचार्ज झाला, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपविरोधात 'इंडिया'ने मोट बांधली आहे. मंबईत ज्या दिवशी ही बैठक झाली त्याच दिवशी जालन्यात मराठा आरक्षण चिघळवून लक्ष विचलित करण्याचा डाव आखला गेला, पण आता मराठा समाजासह ओबीसींमध्ये रोष वाढत आहे, त्यामुळे हा डाव भाजपच्याच अंगलट आला, अशी टीका पटोले यांनी केली.

काँग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या जनसंवाद पदयात्रेनिमित्त नाना पटोले हे ६ सप्टेंबरला शहरात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, सध्या समाजात भीतीचे वातावरण व प्रचंड अस्वस्थता आहे. तलाठी भरतीसाठी खासगी कंपनी नेमली आहे, त्याआडून लूट सुरु आहे.  २०१४ मध्ये भाजपने मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले व लोकसभा व विधानसभा निवडणुकीत फायदा करुन घेतला, पण नंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवावी व  जातनिहाय जनगणना करावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

ओबीसींच्या वाट्याला जाल तर हात भाजून निघेल, असा इशारा त्यांनी दिला. आता मराठा समाज व ओबीसी बांधव देखील आक्रमक आहेत, त्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे. भाजपने केंद्र व राज्यातील सत्ता सोडावी आम्ही सगळ्या समाजाला न्याय देऊ असे त्यांनी सांगितले.   यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंड, आनंदराव गेडाम, पेंटारामा तलांडी, समन्वयक नानाभाऊ गावंडे, प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, डॉ.नितीन कोडवते, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे आदी उपस्थित होते.

चार पटींनी वाढल्या शेतकरी आत्महत्या

राज्यात साडेसात हजार मुली व महिला गायब आहेत, त्या कुठे आहेत, याचा शोध लागत नाही. गृहमंत्री यावर बोलत नाहीत.  भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर पहिली स्वाक्षरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करु असे आश्वासन दिले होते, पण आज उलट स्थिती आहे. शेतकरी आत्महत्या चारपटीने वाढल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्य दुष्काळाच्या सावटाखाली असताना १७ जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाहीत.  शासन आपल्या दारीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरु आहे. सगळा दिखावा सुरु असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे