शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन मराठा आंदोलन, गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन लाठीचार्ज; नाना पटोलेंचा आरोप

By संजय तिपाले | Updated: September 6, 2023 16:21 IST

ओबीसींच्या वाट्याला जाल तर हात भाजून निघेल...

गडचिरोली : मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन जालन्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु झाले तर गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यावर लाठीचार्ज झाला, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपविरोधात 'इंडिया'ने मोट बांधली आहे. मंबईत ज्या दिवशी ही बैठक झाली त्याच दिवशी जालन्यात मराठा आरक्षण चिघळवून लक्ष विचलित करण्याचा डाव आखला गेला, पण आता मराठा समाजासह ओबीसींमध्ये रोष वाढत आहे, त्यामुळे हा डाव भाजपच्याच अंगलट आला, अशी टीका पटोले यांनी केली.

काँग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या जनसंवाद पदयात्रेनिमित्त नाना पटोले हे ६ सप्टेंबरला शहरात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, सध्या समाजात भीतीचे वातावरण व प्रचंड अस्वस्थता आहे. तलाठी भरतीसाठी खासगी कंपनी नेमली आहे, त्याआडून लूट सुरु आहे.  २०१४ मध्ये भाजपने मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले व लोकसभा व विधानसभा निवडणुकीत फायदा करुन घेतला, पण नंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवावी व  जातनिहाय जनगणना करावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

ओबीसींच्या वाट्याला जाल तर हात भाजून निघेल, असा इशारा त्यांनी दिला. आता मराठा समाज व ओबीसी बांधव देखील आक्रमक आहेत, त्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे. भाजपने केंद्र व राज्यातील सत्ता सोडावी आम्ही सगळ्या समाजाला न्याय देऊ असे त्यांनी सांगितले.   यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंड, आनंदराव गेडाम, पेंटारामा तलांडी, समन्वयक नानाभाऊ गावंडे, प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, डॉ.नितीन कोडवते, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे आदी उपस्थित होते.

चार पटींनी वाढल्या शेतकरी आत्महत्या

राज्यात साडेसात हजार मुली व महिला गायब आहेत, त्या कुठे आहेत, याचा शोध लागत नाही. गृहमंत्री यावर बोलत नाहीत.  भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर पहिली स्वाक्षरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करु असे आश्वासन दिले होते, पण आज उलट स्थिती आहे. शेतकरी आत्महत्या चारपटीने वाढल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्य दुष्काळाच्या सावटाखाली असताना १७ जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाहीत.  शासन आपल्या दारीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरु आहे. सगळा दिखावा सुरु असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे