शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

निर्माणींनी घेतला सामाजिक प्रश्नांचा वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 6:00 AM

‘तारुण्यभान ते समाजभान’ ही मुख्य संकल्पना असलेल्या या शिबिरात ‘स्व’चा विस्तार आणि ‘स्व’च्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे. समाजातील मुख्य आव्हानांची ओळख करून देणे. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि आत्मविश्वास निर्माण करणे. अर्थपूर्ण आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वत:साठी स्पष्टता यावी ही काही मुख्य उद्दिष्टे या शिबिराची आहेत.

ठळक मुद्देउत्तरे शोधण्याचा प्रवास : सर्चमधील पहिल्या शिबिराची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करून परिवर्तन घडविणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांनी सुरू केलेल्या निर्माण या उपक्रमाच्या दहाव्या सत्राचे पहिले शिबिर शोधग्राम, गडचिरोली येथे पार पडले. भारतभरातून आलेल्या ५५ युवांनी विविध सामाजिक प्रश्नांचा वेध घेत ती सोडविण्यासाठी कृती कार्यक्रमही तयार केला.‘तारुण्यभान ते समाजभान’ ही मुख्य संकल्पना असलेल्या या शिबिरात ‘स्व’चा विस्तार आणि ‘स्व’च्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे. समाजातील मुख्य आव्हानांची ओळख करून देणे. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि आत्मविश्वास निर्माण करणे. अर्थपूर्ण आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वत:साठी स्पष्टता यावी ही काही मुख्य उद्दिष्टे या शिबिराची आहेत.महाराष्ट्रासह राज्याबाहेरील वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञान, पत्रकारिता, कला, समाजकार्य, वाणिज्य, कृषी, व्यवस्थापन अशा विविध शाखेत शिकत असलेल्या ५५ युवांनी या शिबिरात सहभाग घेतला. माझ्या सामजिक काम करण्यामागच्या प्रेरणा काय, माझी मुल्ये काय, ती मी कशी शोधू, माझी मासिक आर्थिक गरज किती, ती मी कशी काढू, मी काम करण्यासाठी क्षेत्र कोणत्या निकषांवर निवडू, असे प्रश्न समजून घेतले.सामाजिक कार्यासाठी तयार केला आराखडाशिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी दुर्गम व ग्रामीण भागातील गावांना भेटी देत ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला. गटा-गटांनी गावातील विविध प्रश्नांविषयीची निरीक्षणे आणि कृती कार्यक्रम सादर केले. शिबिराच्या अंतिम टप्यात पुढील १५ वर्षात कुठल्या सामाजिक प्रश्नांवर काम करायचे. हे काम करताना स्वत:मध्ये काय बदल करावे लागतील, कुठल्या गोष्टी शिकाव्या व समजून घ्याव्या लागतील याचा विचार करून आगामी सहा महिन्यात मी काय कृती करणार याचा एक ढोबळ आराखडा युवांनी तयार केला.छंद नव्हे जबाबदारीसामाजिक कार्य करणे म्हणजे गरजूंना मदत करणे हेच आजवर माझ्या डोळ्यासमोर असले तरी आवड, छंद आणि जबाबदारी यात मनात संभ्रम होता. छंद म्हणूनच मी या गोष्टीकडे पाहत होती. पण गरजूंना मदत करणे हा छंद नसून टी माझी जबाबदारी असल्याचे लक्षात आले, अशी प्रतिक्रिया शिबिरार्थी मोनाली वांढरे यांनी व्यक्त केली.माझी आवड म्हणून मी संशोधन करणार असाच आजपर्यंतचा माझा विचार होता. निर्माण शिबिरामुळे संशोधन नेमके कशासाठी करायचे, याविषयची संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी सुमेधा मित्तल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Socialसामाजिक