शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

निर्माणींनी घेतला सामाजिक प्रश्नांचा वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

‘तारुण्यभान ते समाजभान’ ही मुख्य संकल्पना असलेल्या या शिबिरात ‘स्व’चा विस्तार आणि ‘स्व’च्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे. समाजातील मुख्य आव्हानांची ओळख करून देणे. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि आत्मविश्वास निर्माण करणे. अर्थपूर्ण आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वत:साठी स्पष्टता यावी ही काही मुख्य उद्दिष्टे या शिबिराची आहेत.

ठळक मुद्देउत्तरे शोधण्याचा प्रवास : सर्चमधील पहिल्या शिबिराची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करून परिवर्तन घडविणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांनी सुरू केलेल्या निर्माण या उपक्रमाच्या दहाव्या सत्राचे पहिले शिबिर शोधग्राम, गडचिरोली येथे पार पडले. भारतभरातून आलेल्या ५५ युवांनी विविध सामाजिक प्रश्नांचा वेध घेत ती सोडविण्यासाठी कृती कार्यक्रमही तयार केला.‘तारुण्यभान ते समाजभान’ ही मुख्य संकल्पना असलेल्या या शिबिरात ‘स्व’चा विस्तार आणि ‘स्व’च्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे. समाजातील मुख्य आव्हानांची ओळख करून देणे. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि आत्मविश्वास निर्माण करणे. अर्थपूर्ण आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वत:साठी स्पष्टता यावी ही काही मुख्य उद्दिष्टे या शिबिराची आहेत.महाराष्ट्रासह राज्याबाहेरील वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञान, पत्रकारिता, कला, समाजकार्य, वाणिज्य, कृषी, व्यवस्थापन अशा विविध शाखेत शिकत असलेल्या ५५ युवांनी या शिबिरात सहभाग घेतला. माझ्या सामजिक काम करण्यामागच्या प्रेरणा काय, माझी मुल्ये काय, ती मी कशी शोधू, माझी मासिक आर्थिक गरज किती, ती मी कशी काढू, मी काम करण्यासाठी क्षेत्र कोणत्या निकषांवर निवडू, असे प्रश्न समजून घेतले.सामाजिक कार्यासाठी तयार केला आराखडाशिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी दुर्गम व ग्रामीण भागातील गावांना भेटी देत ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला. गटा-गटांनी गावातील विविध प्रश्नांविषयीची निरीक्षणे आणि कृती कार्यक्रम सादर केले. शिबिराच्या अंतिम टप्यात पुढील १५ वर्षात कुठल्या सामाजिक प्रश्नांवर काम करायचे. हे काम करताना स्वत:मध्ये काय बदल करावे लागतील, कुठल्या गोष्टी शिकाव्या व समजून घ्याव्या लागतील याचा विचार करून आगामी सहा महिन्यात मी काय कृती करणार याचा एक ढोबळ आराखडा युवांनी तयार केला.छंद नव्हे जबाबदारीसामाजिक कार्य करणे म्हणजे गरजूंना मदत करणे हेच आजवर माझ्या डोळ्यासमोर असले तरी आवड, छंद आणि जबाबदारी यात मनात संभ्रम होता. छंद म्हणूनच मी या गोष्टीकडे पाहत होती. पण गरजूंना मदत करणे हा छंद नसून टी माझी जबाबदारी असल्याचे लक्षात आले, अशी प्रतिक्रिया शिबिरार्थी मोनाली वांढरे यांनी व्यक्त केली.माझी आवड म्हणून मी संशोधन करणार असाच आजपर्यंतचा माझा विचार होता. निर्माण शिबिरामुळे संशोधन नेमके कशासाठी करायचे, याविषयची संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी सुमेधा मित्तल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Socialसामाजिक