शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

दुर्गम भागात हिवताप तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 5:00 AM

सध्या हिवताप रूग्णांची संख्या वाढत असली तरी आजार पूर्णपणे नियंत्रणात आहे. हिवताप कार्यालयामार्फत ११ हंगामी आरटीडब्ल्यू व १ एसएचडब्ल्यू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अतिदुर्गम भागात फवारणीचा कार्यक्रम सुरू असून सर्वेक्षण करून मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकामाचा आढावा : जिल्हास्तरावरील आरोग्य चमू कोटगूल व पिटेसूर भागात पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्हा हिवताप कार्यालयाची आरोग्य चमू तालुक्याच्या अतिदुर्गम कोटगूल व पिटेसूर भागात पोहोचली व या चमूने नागरिकांची हिवताप तपासणी केली. हिवताप तपासणी दूर राहण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. म्हशाखेत्री, जिल्हा माता बाल संगोपण अधिकारी डॉ. समीर बन्सोडे, नोडल अधिकारी डॉ. पंकज हेमंके, कोरचीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी कोरची येथे हिवताप आजाराबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक कामाचा आढावा घेतला.यामध्ये तीव्र जोखमीच्या गरोदर माता, रक्तक्षय, इंजेक्शन, आयर्न, सुक्रोज, कमी वजनाची बालके, संस्थात्मक प्रसुती, मलेरियाचा औषधी साठा, कुटुंब कल्याण कार्यक्रम, जन्म, मृत्यू नोंदणी, कीटकजन्य व जलजन्य आदींचा सावेश आहे. त्यानंतर कोटगूल आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या अतिसंवेदनशील पिटेसूर गावामध्ये या आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट दिली. तेथील ६० लोकांचे रक्तनमुने घेऊन हिवतापाची तपासणी केली. यात एकही रूग्ण हिवताप बाधीत आढळून आला नाही.दरम्यान लम्बडा कार्यक्रमाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. सध्या हिवताप रूग्णांची संख्या वाढत असली तरी आजार पूर्णपणे नियंत्रणात आहे. हिवताप कार्यालयामार्फत ११ हंगामी आरटीडब्ल्यू व १ एसएचडब्ल्यू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अतिदुर्गम भागात फवारणीचा कार्यक्रम सुरू असून सर्वेक्षण करून मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.गॅरापत्ती येथील आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन तेथील आरोग्यविषयक कामाचा आढावा या आरोग्य पथकाने घेतला. आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.आजाराबाबत अशी घ्या काळजीगावातील नाली, गटारे आदींची सफाई करणे, यातील पाणी वाहते करणे, आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, मच्छरदाणीचा वापर, गप्पी मासे सोडणे, संपूर्ण घरांची फवारणी करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी हिवतापाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी या भागातील नागरिकांना सांगितले. पावसाळ्यात कोरची तालुक्यात जलजन्य आजार उद्भवू नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना सदर पाण्याचा पुरवठा करावा, असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान स्थानिक ग्रा.पं. प्रशासन व आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.