शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

जांभूळ व रानमेवाची बाजारपेठ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:21 IST

७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे वनोपज उपलब्ध आहे. या जिल्ह्यातील जांभूळ, रानमेवा व रानभाजी राज्यभरात पोहोचले आहे. रानमेवा व जांभूळाची स्थानिक लोकांकडून मोठी मागणी आहे.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचे प्रतिपादन : जांभूळ व रानमेवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे वनोपज उपलब्ध आहे. या जिल्ह्यातील जांभूळ, रानमेवा व रानभाजी राज्यभरात पोहोचले आहे. रानमेवा व जांभूळाची स्थानिक लोकांकडून मोठी मागणी आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून सदर उत्पादनासाठी व्यासपीठ बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. जांभूळ व रानमेव्याची बारजारपेठ उपलब्ध होण्याकरिता प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र सोनापूर व आत्मा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक कमलकेशव सभागृहात बुधवारी जांभूळ व रानभाजी महोत्सव पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणूून अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पी.आर.कडू, अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ.आर.पी. सिंग, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.डी.अमरशेट्टीवार, प्रेस क्लबचे अध्यक्ष अरविंद खोब्रागडे, माविमचे जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, डॉ. शालिनी बडगे, शास्त्रज्ञ भूषण केवाटे, डॉ.संदीप कºहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिवरकर आदी उपस्थित होते.पुढे बोलताना कुलगुरू डॉ.भाले म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील जर्मप्लाझमचे संवर्धन व मूल्यवर्धन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील गौणउपज यावर प्रक्रिया झाल्यास शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होईल, असा आशावादही डॉ.भाले यांनी यावेळी व्यक्त केला.जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार यांनी गौण उपवनजाच्या मूल्यवर्धनासाठी कंपनी स्थापन होण्याची गरज आहे. जेणे करून उत्पादनातून स्थानिक नागरिकांना अधिक आर्थिक लाभ होईल, असे सांगितले. जि.प. सदस्य योगीता भांडेकर यांनी जांभूळ व रानभाज्या यांचे आहारातील महत्त्व शहरातील नागरिकांना कळले पाहिजे, असे सांगितले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकरी राजेंद्र काळबांधे, मुखरू देशमुख, किसन कर्मकार, महादेव त्रिभाके, एकनाथ अंबादे यांना विविध वाणाच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदीप कऱ्हाडे, संचालन अधिष्ठाता योगीता सानप यांनी केले तर आभार डॉ.तारू यांनी मानले. सदर महोत्सवाला जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिला बचतगट, शेतकरी गटाच्या महिलांसह कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर जांभूळ व रानभाजी महोत्सवात कृषी विज्ञान केंद्र, माविम अंतर्गत महिला बचतगट व इतर शेतकरी महिलांचे मिळून एकूण ४० स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्या ठेवण्यात आल्या होत्या. तसेच विविध प्रकारचे जांभूळ व इतर पदार्थ ठेवण्यात आले होते. सदर प्रदर्शनीला गडचिरोलीतील नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती व विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली. अनेकांनी स्टॉलवर ठेवण्यात आलेल्या पदार्थांचा आस्वादही घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.