शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

जिल्ह्याची ओळख कायम ठेवा-सोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:15 IST

वातावरणातील समतोल बिघडलेला आहे. दुष्काळ, पाणी टंचाई, तीव्र उष्णता आदी समस्यांना सामोर जावे लागत आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. याकरीता जनआंदोलन , लोकचळवळ उभी राहण्याकरीता शासन प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देवृक्ष दिंडीसह उत्साहात सुरुवात : सेमाना पर्यटन उद्यानजवळ वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वातावरणातील समतोल बिघडलेला आहे. दुष्काळ, पाणी टंचाई, तीव्र उष्णता आदी समस्यांना सामोर जावे लागत आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. याकरीता जनआंदोलन , लोकचळवळ उभी राहण्याकरीता शासन प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत मुबलक आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची ओळख वृक्ष लागवड व संवर्धन करून कायम ठेवा, असे आवाहन ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष तथा आमदार प्रा.अनिल सोले यांनी केले.गडचिरोली वनविभाग गडचिरोली आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ रविवारी चामोर्शी मार्गावरील सेमाना पर्यटन उद्यानात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, मुख्य वनसंरक्षक एटबॉन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता पिपरे, उपवनसंरक्षक शिवाजी फुले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.पुढे बोलतांना आमदार सोले म्हणाले, माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत तीन गरजा असल्या तरी पाणी आणि आॅक्सीजन शिवाय आपण जगू शकत नाही. याच गोष्टींसाठी वनाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वातावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येकाने उपलब्ध होईल त्या जागेवर झाडे लावावीत व संवर्धन करावे, असे आवाहन आमदार सोले यांनी केले.आमदार डॉ. होळी यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे याची जाणीव ठेवून आज १ जुलैपासून ३१ जुलैपर्यंत सर्वांनी एकतरी झाड लावावे आणि या मिशनला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी वृक्ष लागवडीसोबतच वृक्षांचे संगोपन करण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे, असे समजून ती स्विकारावी असे आवाहन केले.प्रथम ग्रीन अर्थआॅर्गनायझेशनतर्फेअसर फाऊंडेशन भंडारा येथील वैभव कोलते यांच्या कलापथकाच्या चमुने सादरीकरण करु न जनजागृतीपर संगीतमय कार्यक्र म सादर केला. कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक सुनील पेंदोरकर यांनी केले तर आभार विभागीय वनाधिकारी यांनी मानले.चामोर्शी : वन विभाग व नगर पंचायतीच्या वतीने शहरातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. त्याचबरोबर सांस्कृतिक भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्षा योगीता भांडेकर, आमदार अनिल सोले, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, उपाध्यक्ष राहूल नैताम, उपवनसंरक्षक तांबे, सहायक वनसंरक्षक मडावी, नगर पंचायत मुख्याधिकारी चव्हाण, पं.स. सभापती आनंद भांडेकर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सोले यांनी वृक्षांचे प्रमाण कमी होत गेले तर भविष्यात पाणी व प्राणवायूची गंभीर समस्या निर्माण होईल. त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी, असे आवाहन केले. नगर पंचायत व कार्यकर्त्यांच्या वतीने खासदार अशोक नेते यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निसर्गाचा समतोल बिघडू नये, यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, असे आवाहन खासदारांनी केले. यावेळी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर व आमदार डॉ. होळी यांनीही मार्गदर्शन केले. संचालन दिलीप चलाख तर आभार नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते प्र.सो. गुंडावार, केशव भांडेकर, स्वप्नील वरघंटे, आनंद गण्यारपवार, प्रा. रमेश बारसागडे, विनोद गौरकार, राजू चुधरी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा- नेतेखासदार अशोक नेते म्हणाले, या निसर्गचक्र ात मानव हा प्राणी व वनस्पतीवर अवलंबून आहे. प्राणी व वनस्पती हे मानवावर नाही. तरी पण मानव हा वनाच्या झालेल्या ऱ्हासाचा प्रमुख भागीदार आहे. सृष्टीचे चक्र सुस्थितीत चालण्यासाठी वृक्ष लागवड केल्याशिवाय तरणोपाय नाही. याकरीता जनआंदोलनाची अत्यंत गरज असल्याचे ते म्हणाले. प्रत्येकाने यात खारीचा वाटा उचलून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळीAshok Neteअशोक नेते