शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

Maharashtra Election 2019 ; आतापर्यंत फक्त दोनच महिलांनी लढविला निवडणुकीचा आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 6:00 AM

आजपर्यंत एकाही महिला उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होण्याचा बहुमान मिळालेला नाही. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतही आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी नामांकन दाखल केलेले नाही.

ठळक मुद्देआरमोरी विधानसभा मतदारसंघ : एकूण १२ निवडणुकांमध्ये ९२ जण रिंगणात

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : आरमोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात सन १९६२ पासून आजपर्यंत राज्य विधानसभेसाठी १२ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यातून निवडून आलेले सर्व १२ ही आमदार हे पुरुषच होते. सन १९६२ पासूनच्या निवडणुकांचा आढावा घेतला असता ५८ वर्षांच्या काळात फक्त दोन महिलांनी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी निवडणूक लढवल्याचे दिसून येते.आजपर्यंत एकाही महिला उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होण्याचा बहुमान मिळालेला नाही. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतही आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी नामांकन दाखल केलेले नाही.आरमोरी विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्यावहिल्या सन १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते सन १९९५ पर्यंतच्या तब्बल ३४ वर्षांच्या कालावधीत झालेल्या एकूण आठ निवडणुकींमध्ये प्रथमच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एका महिला उमेदवाराने आरमोरी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. ती महिला उमेदवार होती रजनी बळीराम वरठे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खोब्रागडे) या पक्षाकडून वरठे यांनी निवडणूक लढली. त्यावेळच्या निवडणुकीत १९ उमेदवारांमध्ये त्या एकमेव महिला उमेदवार होत्या. पण त्यांना अवघी १०९४ मते मिळाली. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या रामकृष्ण हरी मडावी यांनी बाजी मारली. मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम यांचा १३ हजार ४४८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत महिला उमेदवार रजनी वरठे पराभूत झाल्या असल्या तरी आरमोरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एक महिला म्हणून लढण्याचा मान त्यांना प्राप्त झाला.त्यानंतरच्या सन १९९९, सन २००४ आणि सन २००९ मध्ये झालेल्या तीनही निवडणुकीत एकही महिला उमेदवार निवडणूक लढली नाही. सन १९९५ पासून पुन्हा १९ वर्षानंतर, म्हणजे २०१४ ला दुसऱ्यांदा एका महिलेने निवडणूक लढली. त्या महिला उमेदवार होत्या कोमल रवी बारसागडे (ताडाम). बहुजन समाज पार्टीने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांना १५ हजार ६९७ एवढी मते मिळाली होती. पण त्यांना विजयश्री गाठता आली नाही. त्यावेळी प्रथमच भारतीय जनता पक्षाकडून लढलेले कृष्णा गजबे यांनी दोन वेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा १२ हजार ७३३ मतांनी पराभव केला.या मतदारसंघात सन १९६२ पासून आजपर्यंतच्या ५८ वर्षांत झालेल्या एकूण १२ निवडणुकांमध्ये ९२ उमेदवारांनी निवडणूक लढली. त्यात तब्बल ८९ उमेदवार पुरुष तर फक्त दोन उमेदवार महिला होत्या.

टॅग्स :armori-acअरमोरी