शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Maharashtra Election 2019 ; मतदान टक्केवारीने गाठली सत्तरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 6:00 AM

संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या वेळी मुख्यालयी पोहोचतात. सोमवारी दुपारी ३ वाजता मतदान आटोपले असले तरी हे कर्मचारी बेस कॅम्प या सुरक्षित स्थळीच मुक्कामी होते. तेथून मतदार संघाच्या मुख्यालयी पोहोचण्यासाठी बहुतांश केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मंगळवारची सायंकाळ झाली.

ठळक मुद्दे्गेल्या दोन निवडणुकींपेक्षा सरस : गडचिरोली, अहेरीत २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील तीनही मतदार संघाची विधानसभा निवडणूक यावेळी अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. अभूतपूर्व जनजागृतीसोबतच नक्षलवाद्यांचे हिंसक कारवाया करण्याचे मनसुबे हाणून पाडण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. परिणामी गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी पार करण्यात यावेळी यश आले.मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार सर्वाधिक ७१.२ टक्के मतदान आरमोरी मतदार संघात झाले आहे. गडचिरोलीत ६८.४७ तर सर्वात जास्त नक्षलप्रभावित आणि दुर्गम भाग असलेल्या अहेरीत ७०.३४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झालेली नव्हती. काही केंद्रांवरील आकड्यांची भर त्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली.आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तीनही मतदार संघातील ७ लाख ७५ हजार ३६९ मतदारांपैकी जवळपास साडेचार लाखावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे ९३२ मतदान केंद्रांपैकी ४५ टक्के मतदान केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल होते. त्यापैकी एटापल्ली तालुक्यात काही मतदान केंद्र वेळेवर दुसरीकडे हलविण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र तरीही त्यांनी मोठ्या हिमतीने त्या केंद्रांवर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. नक्षलवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाला भीक न घालता मतदारांनी विविध अडचणींवर मात करत दाखविलेली हिंमत प्रशासकीय यंत्रणेच्या उत्साहात भर घालणारी ठरली. दुर्गम भागात युवा पिढीपेक्षाही प्रौढ मतदारांमध्ये जास्त उत्साह आणि आशा दिसून आली.३१ तासानंतर नेमकी टक्केवारी नाहीचसंवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या वेळी मुख्यालयी पोहोचतात. सोमवारी दुपारी ३ वाजता मतदान आटोपले असले तरी हे कर्मचारी बेस कॅम्प या सुरक्षित स्थळीच मुक्कामी होते. तेथून मतदार संघाच्या मुख्यालयी पोहोचण्यासाठी बहुतांश केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मंगळवारची सायंकाळ झाली. त्यानंतर बुथनिहाय सर्व आकडेवारी पडताळणी करण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यापासून ३१ तासानंतरही म्हणजे मंगळवारच्या रात्री १० वाजतापर्यंत मतदानाच्या टक्केवारीचा अंतिम आकडा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला नव्हता.नक्षलवाद्यांचे मनसुबे फेलनक्षलवाद्यांकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही घातपाती कारवाया, गोळीबार, भूसुरूंग स्फोट घडवून आणले जाण्याची शक्यता पाहता पोलीस दलाने योग्य ती खबरदारी घेत सर्व तयारी केली होती. त्यामुळे नक्षलवादी कोणत्याही कारवाया घडवून आणण्यात यशस्वी झाले नाही. गेल्या अनेक निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत नक्षली कारवाया नियंत्रणात राहिल्या.अभूतपूर्व जनजागृतीनिवडणुकीचे कर्तव्य प्रत्येक मतदाराने पार पाडाने यासाठी जिल्हाभरात अभूतपूर्व अशी जनजागृती झाली. शाळा-महाविद्यालयांपासून तर सण-उत्सवापर्यंत सर्वच ठिकाणी मतदानाचे महत्व सांगण्यात आले. गावागावात रॅली काढून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून नक्षली दहशतीतही नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली