शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

By admin | Updated: October 26, 2014 22:39 IST

राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, तलाठी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहे. शासनाने कर्मचाऱ्यांना

गडचिरोली : राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, तलाठी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहे. शासनाने कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने दिले आहेत. मात्र मुख्यालयी राहण्याच्या शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामे खोळंबली असल्याचे दिसून येते. परिणामी शासकीय निवासस्थाने निरूपयोगी ठरली आहेत.गावाच्या विकासासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून ग्रामीण जनतेला विशेष माहिती नसते. शासन व गाव यांच्यातील मुख्य दुवा ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, शिक्षक, तलाठी, डॉक्टर आदी कर्मचारी आहेत. त्यामुळे सदर कर्मचारी व अधिकारी मुख्यालयात राहणे आवश्यक आहे. शासकीय कर्मचारी जर ग्रामीण भागात मुख्यालय राहून सेवा दिल्यास गावाचा विकास झपाट्याने होते. शासकीय सेवेमध्ये रूजू होतांना मुख्यालयात राहण्याची अट असते. त्यासाठी त्यांना विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच मुख्यालयी राहण्याचा भत्तासुद्धा दिला जातो. परंतु या आदेशाला न जुमानता गरजेनुसार राहणे व मुख्यालयी राहण्याचे कर्तव्य समजून न घेता आपल्या मर्जीप्रमाणे शासकीय कर्मचारी वागत असल्याचे अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांकरिता १५ टक्के प्रोत्साहनभत्ता व एकस्तर पदोन्नती लागू केली आहे. याचा लाभ घेणारे ८० टक्के कर्मचारी आहेत. अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आपल्या विविध कामाकरिता मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. बहुतांश कर्मचारी गावात नातलगाच्या घरी तसेच आपले निकटचे संबंध असलेल्या घरी आपल्या नावाच्या फलकाची पाटी लावून घरभाडे उचलत असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे. सदर कर्मचारी स्वत:च्या कुटुंबाच्या विकासाकरिता तालुक्याच्या ठिकाणी मुख्यालयी वास्तव्य करीत आहे. जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी राहून ये-जा करीत असल्याने ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. याला शासकीय प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. बरेचसे कर्मचारी तहसील व पंचायत समिती कार्यालयात बैठक असल्याचे सांगून दांड्या मारीत असल्याचेही दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागाचा तसेच सोयीसुविधेचा अभाव असल्याचा बाऊ करून अनेक शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देण्यास कुचराई करीत आहेत. या समस्येची प्रशासनाने दखल घेऊन गुप्त दौरे कार्यक्रम राबवून मुख्यालयीन न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.