शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

By admin | Updated: October 26, 2014 22:39 IST

राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, तलाठी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहे. शासनाने कर्मचाऱ्यांना

गडचिरोली : राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, तलाठी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहे. शासनाने कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने दिले आहेत. मात्र मुख्यालयी राहण्याच्या शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामे खोळंबली असल्याचे दिसून येते. परिणामी शासकीय निवासस्थाने निरूपयोगी ठरली आहेत.गावाच्या विकासासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून ग्रामीण जनतेला विशेष माहिती नसते. शासन व गाव यांच्यातील मुख्य दुवा ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, शिक्षक, तलाठी, डॉक्टर आदी कर्मचारी आहेत. त्यामुळे सदर कर्मचारी व अधिकारी मुख्यालयात राहणे आवश्यक आहे. शासकीय कर्मचारी जर ग्रामीण भागात मुख्यालय राहून सेवा दिल्यास गावाचा विकास झपाट्याने होते. शासकीय सेवेमध्ये रूजू होतांना मुख्यालयात राहण्याची अट असते. त्यासाठी त्यांना विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच मुख्यालयी राहण्याचा भत्तासुद्धा दिला जातो. परंतु या आदेशाला न जुमानता गरजेनुसार राहणे व मुख्यालयी राहण्याचे कर्तव्य समजून न घेता आपल्या मर्जीप्रमाणे शासकीय कर्मचारी वागत असल्याचे अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांकरिता १५ टक्के प्रोत्साहनभत्ता व एकस्तर पदोन्नती लागू केली आहे. याचा लाभ घेणारे ८० टक्के कर्मचारी आहेत. अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आपल्या विविध कामाकरिता मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. बहुतांश कर्मचारी गावात नातलगाच्या घरी तसेच आपले निकटचे संबंध असलेल्या घरी आपल्या नावाच्या फलकाची पाटी लावून घरभाडे उचलत असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे. सदर कर्मचारी स्वत:च्या कुटुंबाच्या विकासाकरिता तालुक्याच्या ठिकाणी मुख्यालयी वास्तव्य करीत आहे. जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी राहून ये-जा करीत असल्याने ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. याला शासकीय प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. बरेचसे कर्मचारी तहसील व पंचायत समिती कार्यालयात बैठक असल्याचे सांगून दांड्या मारीत असल्याचेही दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागाचा तसेच सोयीसुविधेचा अभाव असल्याचा बाऊ करून अनेक शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देण्यास कुचराई करीत आहेत. या समस्येची प्रशासनाने दखल घेऊन गुप्त दौरे कार्यक्रम राबवून मुख्यालयीन न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.