शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध धम्माच्या अष्टांग मार्गाने जीवन जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:53 IST

त्रिशरण, पंचशील यांच्यासोबतच बुद्धाच्या अष्टांग मार्गाचा स्वीकार करून जीवन जगावे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे सचिव राजरत्न आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे तथागत महोत्सव; त्रिशरण व पंचशील आत्मसात करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : त्रिशरण, पंचशील यांच्यासोबतच बुद्धाच्या अष्टांग मार्गाचा स्वीकार करून जीवन जगावे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे सचिव राजरत्न आंबेडकर यांनी केले.देसाईगंज येथील त्रिरत्न समता संघ सामाजिक बचतगट देसाईगंजच्या वतीने १८ व १९ फेब्रुवारी रोजी दीक्षाभूमीवर तथागत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमाला डॉ.युवराज मेश्राम, अ‍ॅड.सविता बेदरकर, कैलाश भेंगडे, डॉ.किशोर जीवने, बेनिराम कापगते, कविता मेश्राम, ममता जांभुळकर, विजय मेश्राम, इंदूताई पिपरे, चंद्रशेखर बांबोळे, अशोक इंदुरकर, प्रल्हाद कराडे, बौद्धकुमार लोणारे, सुनीता साळवे, आशा कापगते, प्रा.अनिल कानेकर, उद्धव रंगारी, प्रकाश बन्सोड, भास्कर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आंदोलनासोबतच बौद्ध धम्मावरही प्रकाश टाकला. महाड येथील चवदार तळे आंदोलन, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन यांची माहिती दिली.बौद्ध धम्माच्या अनुयायांनी त्रिशरण आणि पंचशील याशिवाय अष्टांगिक मार्गांचा अवलंब करून जीवन जगावे, याशिवाय बौद्धांचा उद्धार शक्य नाही. बौद्ध धम्माचे विचार समुद्राच्या खोलीप्रमाणे विस्तीर्ण आहेत. जसजसे आपण बौद्ध धम्माचा सविस्तर अभ्यास करू तसतसे नवनवीन बुद्ध तुम्हाला कळतील. समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दलित, पीडित, शोषित लोकांना धम्माच्या प्रवाहामध्ये त्यांनी आणले. देशामध्येच नव्हे तर जगामध्ये समता प्रस्तापित करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वत:चे जीवन वाहून घेतले. त्यामुळे त्यांना स्वत:च्या कुटुंबाकडे फारसे लक्ष देता आले नाही.१९५४ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. तीच महासभा आज जगातील बौद्ध राष्ट्रामध्ये काम करीत आहे. अ‍ॅड. सविता बेदरकर यांनी मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारावर प्रकाश टाकला.संचालन नैना दरडमारे, प्रास्ताविक त्रिरत्न समता संघाचे मुख्य प्रवर्तक विजय बन्सोड तर आभार अ‍ॅड.सोनाली मेश्राम यांनी मानले.७० महिलांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षागडचिरोली शहर व तालुक्यातील मादगी समाजाच्या जवळपास ७० महिलांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. भंते नंद यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. राजरत्न आंबेडकर यांनी नवबौद्धांकडून २२ प्रतीज्ञा वदवून घेतल्या. गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते धम्मराव तानादू यांच्या नेतृत्त्वात दीक्षा घेण्यात आली. दीक्षा घेणाºयांना बौद्ध आणि धम्म हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान गुणवंत व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमाला जवळपास पाच हजार नागरिक उपस्थित होते.रेस्टाहाऊस ते दीक्षाभूमीपर्यंत राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात रॅली काढण्यात आली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या धीम ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.