शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कसनासूरवासीयांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:43 PM

एकाच दिवशी गावातील तीन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्याने भयभित झालेल्या भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या नागरिकांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या भेटीने दिलासा मिळाला.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या भेटीने आशा पल्लवित : योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : एकाच दिवशी गावातील तीन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्याने भयभित झालेल्या भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या नागरिकांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या भेटीने दिलासा मिळाला. गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी त्या दुर्लक्षित गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्याची ग्वाही दिल्याने कसनासूरवासीयांचा जीव भांड्यात पडला आहे.छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेले कसनासूर हे गाव गेल्यावर्षी झालेल्या नक्षल चकमकीनंतर देशभर चर्चेत आले. या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी, भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांनी १२ फेब्रुवारी रोजी काही अंतर पायी चालून गाव गाठले.गावाचा विकास करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. कृषी विभागामार्फत वितरित केले जाणारे शेतीचे आधुनिक साहित्य या गावकºयांना उपलब्ध करून द्यावे, वनजमिनीचे पट्टे मिळण्यासाठी वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, आरोग्य, शिक्षण या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश अधिनस्त अधिकाºयांना त्यांनी दिले. त्यामुळे आपल्या गावाच्या विकासाबाबत नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.