शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

गुणवत्ता वाढीचे शिक्षकांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले वर्गात विद्यार्थ्यांची अनियमितता, विद्यार्थ्यांचा अध्ययनात आवश्यक प्रतिसाद न मिळणे, परीक्षेचे पॅटर्न बदलणे, परीक्षेचा पाहिजे तसा सराव झाला नाही आदी कारणे निकाल कमी लागण्यास पुढे आलेली आहेत.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन : शालांत परीक्षेचा निकाल उंचवा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी, भामरागड प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांतील तसेच जिल्ह्यातील जि.प. हायस्कूलमधील इयत्ता दहावीला शिकविणाºया माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा रविवारी येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत पार पडली.आकांक्षित जिल्हा कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या संकल्पनेतून सदर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे म्हणाले, मागील वर्षी जिल्ह्यात इयत्ता दहावीचा निकाल कमी लागला त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. विद्यार्थी कुठे कमी पडतो हे जाणून शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे. विद्यार्थी प्रगत झाले पाहिजे यासाठी शिक्षकांनी मनापासून काम करावे. यावर्षीचा निकाल उंचावण्यासाठी अशा कार्यशाळेची आवश्यकता आहे. कार्यशाळेतून दिशा मिळते व पुढील उपाययोजना करता येतात. त्यासाठी शिक्षकांचा सामूहिक सहभाग व परिश्रम आवश्यक आहे.डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले वर्गात विद्यार्थ्यांची अनियमितता, विद्यार्थ्यांचा अध्ययनात आवश्यक प्रतिसाद न मिळणे, परीक्षेचे पॅटर्न बदलणे, परीक्षेचा पाहिजे तसा सराव झाला नाही आदी कारणे निकाल कमी लागण्यास पुढे आलेली आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शिकविलेला पाठ्यांश समजला की नाही याचा शिक्षकांनी शोध घेऊन परीक्षेसबंधात विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असाव्या. आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांमध्ये इष्ट बदल होणे अपरिहार्य आहे.यावेळी डीआयईसीपीडीचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनीत मत्ते, वैशाली येगलोपवार, पुनित मातकर, सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, मुख्याध्यापक डी. डी. शेंडे आदी उपस्थित होते.गडचिरोली प्रकल्पातील २४, अहेरीतील ११ व भामरागड प्रकल्पातील ८ अशा एकूण ४३ शासकीय आश्रमशाळातील तसेच जिल्ह्यातील १० जि.प. हायस्कूलचे एकूण २१५ माध्यमिक शिक्षकांचा या कार्यशाळेत सहभाग होता. या कार्यशाळेत सहभागी सर्व माध्यमिक शिक्षकांची शेवटी विषयनिहाय चाचणी घेण्यात आली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आश्रमशाळांतील व डीआईसीपीडीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Teacherशिक्षक