शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

अधिकृत वीज जोडणीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 11:25 PM

जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. तसेच हजारो बल्बसाठी अधिक व्होल्टेजची आवश्यकता भासते. विद्युत जोडणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते.

ठळक मुद्देपावसामुळे वीजेच्या अपघाताची शक्यता : केवळ १४ गणेश मंडळांनी केले महावितरणकडे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ढोलताशांच्या गजरात यावर्षीही सार्वजनिक मंडळे व खासगीरित्या अनेकांनी गणरायाची १० दिवसांसाठी प्रतिष्ठापणा केली. मात्र सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्हाभरात सुमारे ७५० सार्वजनिक मंडळांतर्फे गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली, मात्र महावितरण कंपनीकडे अधिकृत वीज पुरवठ्यासाठी जिल्हाभरातून केवळ १४ अर्ज प्राप्त झाले आहेत. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने यावर्षीही रोषणासाठी अनधिकृत वीज पुरवठा घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. तसेच हजारो बल्बसाठी अधिक व्होल्टेजची आवश्यकता भासते. विद्युत जोडणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, यासाठी महावितरणतर्फे वीज बिलात सवलत सुध्दा दिली जाते. तरीही बहुतांश गणेश मंडळे जवळपासच्या एखाद्या वीज तारेवर हुक लटकवून वीज पुरवठा घेत असल्याचे दिसून येते.वीज जोडणीसाठी गडचिरोली विभागांतर्गत २ सप्टेंबरपर्यंत १२ गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी चार मंडळांनी पैसे भरल्याने त्यांना अधिकृत वीज पुरवठा देण्यात आला आहे. एका मंडळाने पैसे भरले नाही. १२ अर्जांपैकी सात अर्ज २ सप्टेंबर रोजी उपलब्ध झाले. त्यांना वीज पुरवठा देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आलापल्ली विभागांतर्गत केवळ दोन मंडळांनी अर्ज केले होते. या दोन्ही मंडळांना वीज पुरवठा दिला आहे.गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, यासाठी महावितरणतर्फे वीज बिलात सूट दिली जाते. अधिकृत वीज पुरवठा घेतल्यास विद्युत संचाची जोडणी योग्य आहे किंवा नाही, याची शहनिशा महावितरणचे अधिकारी करतात. सुरक्षिततेबाबत योग्य काळजी घेतली जाते. यावर्षी पाऊस येत आहे. त्यामुळे वीज तारांवर हुक लटकवून अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या मंडळांनी अजुनही वीज पुरवठ्यासाठी अर्ज केला नाही, त्यांनी अर्ज करावा व अधिकृत वीज पुरवठा घ्यावा. अनधिकृत वीज पुरवठा असलेल्यांवर यावर्षी नक्कीच कारवाई केली जाईल.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता,महावितरण गडचिरोली

टॅग्स :electricityवीज