शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

पट्टेधारक सातबारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:11 IST

वननिवासी वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत तालुक्यातील रामपूर चेक येथील वनजमिनीवरील अतिक्रमणधारक शेतकºयांना २६ डिसेंबर २०१७ ला वनहक्क पट्टे मंजूर झाले. परंतु नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही सातबारा उपलब्ध करून देण्यात आला नाही.

ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : रामपूर चेक येथील शेतकऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : वननिवासी वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत तालुक्यातील रामपूर चेक येथील वनजमिनीवरील अतिक्रमणधारक शेतकºयांना २६ डिसेंबर २०१७ ला वनहक्क पट्टे मंजूर झाले. परंतु नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही सातबारा उपलब्ध करून देण्यात आला नाही. येथील २१ शेतकरी सातबारापासून वंचित आहेत. सदर शेतकऱ्यांना त्वरित सातबारा वितरित करावा, अशी मागणी शेतकºयांनी अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.रामपूर चेक येथील २१ शेतकऱ्यांना २६ डिसेंबर २०१७ ला वनहक्क पट्टे मंजूर झाले. त्यानंतर मे २०१८ ला वनहक्क पट्टे प्राप्त झाले. परंतु अद्यापही तलाठी साजाला सातबारा व नमुना आठ-अ व पट्ट्याची नोंद घेऊन खतावणी करण्यात आली नाही. वनहक्क पट्टे मंजूर होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाच्या सूचनेनुसार मंजुरी मिळाल्यानंतर तसेच वनहक्क पट्टे प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्यानंतर साजाला नोंद घेणे आवश्यक आहे. परंतु या कार्यवाहीला विलंब होत आहे. परिणामी शेतकºयांना सातबारावर मिळणारे पीजकर्ज तसेच इतर योजनांचा लाभ घेता येत नाही. वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही करून २१ वनहक्क पट्टेधारकांना सातबारा मिळवून द्यावे तसेच तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना निर्देशीत करावे, अशी मागणी शेतकरी लिंगा बाकीवार, रामुलू कुळमेथे, शंकर पंदीलवार, लीलाबाई मोहुर्ले, गजानन पानेमवार, म्हैसुबाई गोमासे, मल्ला मंचर्लावार, लालू भट्टीवार, येल्लुबाई संदारपवार, जयाबाई ठाकरे, भीमा गौरारपवार, मंजूळा चांदेकर, रामय्या जनार्धन, पेंटा पानेमवार, तुळशिराम गोवर्धन, पोच्चा पानेमवार, राजू भट्टीवार, मल्ला बद्दीवार, रामा बद्दीवार, लचमा टेकुलवार, अमक्का चांदेकर यांनी केली आहे.सात वर्षांपासून समस्या प्रलंबितवनहक्क कायद्यानुसार २०११ मध्ये जिल्ह्यात अनेक पारंपरिक वननिवासी व इतर अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. वैयक्तिक व सामूहिक दावे शेतकऱ्यांना प्राप्त झाले. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना सातबारा अथवा नमुना आठ-अ ची नोंद तलाठी साजात घेण्यात आली नाही. तसेच ते वितरित सुद्धा करण्यात आले नाही. परिणामी पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासही अडचणी येत आहेत. शेतकरी भरपाईपासून सुद्धा वंचित आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी