शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

कुरूळच्या युवकांनी धरला गाव स्वच्छतेचा ध्यास

By admin | Updated: December 13, 2014 22:39 IST

केंद्र शासनाने भारत स्वच्छ मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाची अंमलबजावणी देशभरात सुरू केली आहे. मात्र अशाही परिस्थितीत स्वच्छतेकडे ग्रा. पं. पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

मिलींद मेडपिलवार - तळोधी (मो.)केंद्र शासनाने भारत स्वच्छ मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाची अंमलबजावणी देशभरात सुरू केली आहे. मात्र अशाही परिस्थितीत स्वच्छतेकडे ग्रा. पं. पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अशा नकारात्मक भूमिकेला तिलांजली देऊन चामोर्शी तालुक्यातील कुरूळ येथील सात सुशिक्षित युवकांनी १२ डिसेंबरपासून प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा उपक्रम सुरू केला आहे. संपूर्ण गाव स्वच्छ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा चंग या युवकांनी बांधला आहे.कुरूळ येथे १२ डिसेंबरपासून या युवकांच्यावतीने पहाटे ४ वाजतापासून सकाळी १० वाजेपर्यंत गावाची स्वच्छता केली जात आहे. गावातील एक -एक अंतर्गत रस्ता तसेच गावाबाहेरचे अस्वच्छ रस्ते स्वच्छ करण्याचे काम हे युवक करीत आहेत. संपूर्ण गाव स्वच्छ होईपर्यंत हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे या युवकांनी सांगितले. स्वच्छ व आदर्श गाव करण्यासाठी आम्हाला कोणत्याही ग्रा. पं. पदाधिकारी तसेच इतरांच्या मदतीची गरज नाही, असाही मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. शासनाचा उपक्रम म्हणून बहुतेक गावातील ग्रा. पं. पदाधिकारी केवळ १० ते १५ मिनिटासाठी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा कांगावा करतात. मात्र त्यानंतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा गावाला अस्वच्छतेचे मूळ स्वरूप प्राप्त होते. सात युवकांनी गेल्या दोन दिवसात बसथांब्यापासून गावात जाणारा रस्ता, बायपास रामपूर रस्ता झाडून स्वच्छ केला. तसेच खताच्या ढिगाऱ्याचीही गावाबाहेर दूर विल्हेवाट लावली. या स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे नितीन शेंडे, प्रमोद चलाख आदींसह गीतेश बारसागडे, विनय मडावी, महेश सातपुते, दीपक नैताम, दीपक मडावी आदी सहभागी झाले आहे. सुशिक्षित युवकांनी स्वच्छतेचा विडा उचलल्यामुळे सदर उपक्रम गावकऱ्यांसाठी स्वच्छतेचा संदेश देणारा आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे सुशिक्षित युवक प्रत्येक गावातून पुढे येण्याची गरज आहे.