शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

कुणबी समाजाने एकसंघ राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:55 PM

महाराष्टÑात ५२ टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आजही मागासलेला आहे. त्यात शेती हा मुख्य व्यवसाय असलेला कुणबी समाज अद्यापही आपल्या मूलभूत अधिकार व हक्कापासून वंचित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्टÑात ५२ टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आजही मागासलेला आहे. त्यात शेती हा मुख्य व्यवसाय असलेला कुणबी समाज अद्यापही आपल्या मूलभूत अधिकार व हक्कापासून वंचित आहे. राजकीय व्यवस्थेने ओबीसी व कुणबी समाजाची पूर्णत: वाट लावली आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरीही प्रचंड अडचणीत सापडला आहे. आता शेतकरी व कुणबी समाजाला वाचवून त्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी कुणबी समाजाने सदैव जागृत राहून कायम एकसंघ राहावे, असा सूर माजी खासदार नाना पटोले, आमदार बाळू धानोरकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी यावेळी काढला.कुणबी समाज संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर कुणबी महामेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या मेळाव्यााला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार नाना पटोले, आमदार सुनिल केदार, आमदार बाळू धानोरकर तर वक्ते म्हणून प्रसिध्द साहित्यीक तथा कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर, प्रा. दिलीप चौधरी, मेघा रामगुंडे, वैष्णवी डाफ, प्रफुल गुळधे पाटील, नरेंद्र जिचकार उपस्थित होते.कुणबी समाज उन्नत व प्रगत नाही. त्यामुळे या समाजातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धीच शिष्यवृत्ती मिळते, वसतिगृहाची सोय नाही. त्यामुळे शिक्षण घेताना ओबीसी विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब दारिद्र्याच्या खाईत जात आहेत, असेही उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यासह शेजारच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील जवळपास २० हजारांवर कुणबी समाज बांधवांनी हजेरी लावली होती. महिला व युवतींचीही या महामेळाव्यात लक्षणिय उपस्थिती होती. याप्रसंगी आ.सुनिल केदार यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महेंद्र ब्राह्मणवाडे, संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार धनपाल मिसार यांनी मानले.मान्यवरांचा सूर : कुणबी महामेळाव्याला २० हजारपेक्षा अधिक समाजबांधवांची उपस्थितीमतपेटीतून एकता दिसू द्या - ज्ञानेश वाकुडकरसरकारला गायीच्या मूत्राची किंमत आहे. मात्र शेतकरी आत्महत्येचे काहीही देणेघेणे नाही. जात कुणबी, धर्म कुणबी, पक्ष कुणबी, संघटना कुणबी या तत्वाने मार्गक्रमण करून शेतकरी विरोधी राजकीय नेत्यांना धडा शिकवा, २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कुणबी समाज बांधवाने या मेळाव्यासारखीच मतपेटीतून एकता दाखवून यापुढे महाराष्टÑाचा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा बनवा असे आवाहन साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी यावेळी केले.हक्क नाकारणाºयांना धडा शिकवा - चौधरीमाणसाला अर्थात शेतकऱ्याला मारून भारत महासत्ता कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करून चांगले व वाईट काय हे समजून घेऊन त्यानुसार जीवनात मार्गक्रमण करा. निवडून दिलेले पुढारी आपले ऐकत नसतील तर त्यांना निवडणुकीत पाडता आले पाहिजे. सध्या भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा सत्ताधाऱ्यांमध्ये लागली आहे. कुणबी, ओबीसी समाज व शेतकऱ्यांचे हक्क नाकारणाºया नेत्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.अन्याय खपवून घेणार नाही - वैष्णवी डाफशेतकऱ्यांच्या समस्येवर छत्रपती शिवाजी महाराज कटाक्षाने लक्ष देत होते. शिवाजी महाराजांचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होते. मात्र आता शेतकरी, कुणबी व ओबीसी समाजावर सर्वच क्षेत्रात शासनाकडून अन्याय होत आहे. या समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांला त्यांनी पिकवलेलया धानाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. हा अन्याय कुणबी समाज बांधव आता खपवून घेणार नाही, असा इशारा वैष्णवी डाफ यांनी दिला.स्मार्ट व्हिलेज कधी होणार - मेघा रामगुंडे५२ टक्के लोकसंख्येच्या ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे, आम्हाला भिक नको तर आमचे अधिकार व हक्क द्या, अशी मागणी करीत विद्यमान सरकार स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन करण्यावर भर देत आहे. मात्र देशात व महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. सरकारचे खेडेगावाकडे दुर्लक्ष आहे. स्मार्ट व्हिलेज कधी होणार, ग्रामीण भागातील शेतकरी केव्हा प्रगत होणार असा सवाल मेघा रामगुंडे यांनी केला.

टॅग्स :kunbiकुणबी