शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

कोरची तालुक्यात होणार काट्याच्या लढती

By admin | Updated: January 28, 2017 01:23 IST

तालुक्यात कोटरा-बिहिटेकला व बेडगाव-कोटगूल हे जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. या दोन्ही क्षेत्रात काट्याच्या लढती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सर्वच पक्ष लागले कामाला : दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रात राहणार तगडे उमेदवार; पंचायत समितीकडेही लागले लक्षलिकेश अंबादे  कोरचीतालुक्यात कोटरा-बिहिटेकला व बेडगाव-कोटगूल हे जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. या दोन्ही क्षेत्रात काट्याच्या लढती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कोटरा-बिहिटेकला हा जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जमाती पुरूषासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर बेडगाव-कोटगूल क्षेत्र ओबीसी महिलेकरिता राखीव ठेवण्यात आला आहे. कोरची तालुक्यातील निवडणूक पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सद्य:स्थितीत बेडगाव-कोटगूल क्षेत्रातून पद्माकर मानकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर कोटरा-बिहिटेकला क्षेत्रातून मागीलवेळी सुनंदा आतला या युवाशक्तीच्याच उमेदवार निवडून आल्या होत्या. गडचिरोली जिल्ह्यातील युवाशक्ती आता शिवसेनेमध्ये विलीन झाले आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रामधून शिवसेनेचेच उमेदवार उभे केले जाणार आहेत. कोरची तालुक्यातील गोंड समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘ग्रामसभा’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरची तालुक्यात गोंड समाजातील मतदारांची संख्या मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ग्रामसभा या पक्षाने शक्तीनिशी प्रचार केल्यास राष्ट्रीय पक्षांसमोरील अडचण वाढण्याची शक्यता आहे. २००७ मध्ये कोरची तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसच्या ज्योती भैसारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण निकोडे हे उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. कोरची पंचायत समितीतही एकूण चार उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला होता. या पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर मात करीत युवाशक्तीने आपला जम बसविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जुना गड आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच विधानसभा व लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपासाठी अनुकूल वातारण तयार झाले. याचा फायदा उचलण्याची तयारी भाजपाने केली आहे. युवाशक्तीच्या माध्यमातून तयार झालेला गड आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.