शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

कोरची तालुक्यात होणार काट्याच्या लढती

By admin | Updated: January 28, 2017 01:23 IST

तालुक्यात कोटरा-बिहिटेकला व बेडगाव-कोटगूल हे जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. या दोन्ही क्षेत्रात काट्याच्या लढती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सर्वच पक्ष लागले कामाला : दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रात राहणार तगडे उमेदवार; पंचायत समितीकडेही लागले लक्षलिकेश अंबादे  कोरचीतालुक्यात कोटरा-बिहिटेकला व बेडगाव-कोटगूल हे जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. या दोन्ही क्षेत्रात काट्याच्या लढती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कोटरा-बिहिटेकला हा जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जमाती पुरूषासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर बेडगाव-कोटगूल क्षेत्र ओबीसी महिलेकरिता राखीव ठेवण्यात आला आहे. कोरची तालुक्यातील निवडणूक पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सद्य:स्थितीत बेडगाव-कोटगूल क्षेत्रातून पद्माकर मानकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर कोटरा-बिहिटेकला क्षेत्रातून मागीलवेळी सुनंदा आतला या युवाशक्तीच्याच उमेदवार निवडून आल्या होत्या. गडचिरोली जिल्ह्यातील युवाशक्ती आता शिवसेनेमध्ये विलीन झाले आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रामधून शिवसेनेचेच उमेदवार उभे केले जाणार आहेत. कोरची तालुक्यातील गोंड समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘ग्रामसभा’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरची तालुक्यात गोंड समाजातील मतदारांची संख्या मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ग्रामसभा या पक्षाने शक्तीनिशी प्रचार केल्यास राष्ट्रीय पक्षांसमोरील अडचण वाढण्याची शक्यता आहे. २००७ मध्ये कोरची तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसच्या ज्योती भैसारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण निकोडे हे उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. कोरची पंचायत समितीतही एकूण चार उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला होता. या पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर मात करीत युवाशक्तीने आपला जम बसविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जुना गड आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच विधानसभा व लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपासाठी अनुकूल वातारण तयार झाले. याचा फायदा उचलण्याची तयारी भाजपाने केली आहे. युवाशक्तीच्या माध्यमातून तयार झालेला गड आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.