शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरची तालुक्यात होणार काट्याच्या लढती

By admin | Updated: January 28, 2017 01:23 IST

तालुक्यात कोटरा-बिहिटेकला व बेडगाव-कोटगूल हे जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. या दोन्ही क्षेत्रात काट्याच्या लढती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सर्वच पक्ष लागले कामाला : दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रात राहणार तगडे उमेदवार; पंचायत समितीकडेही लागले लक्षलिकेश अंबादे  कोरचीतालुक्यात कोटरा-बिहिटेकला व बेडगाव-कोटगूल हे जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. या दोन्ही क्षेत्रात काट्याच्या लढती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कोटरा-बिहिटेकला हा जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जमाती पुरूषासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर बेडगाव-कोटगूल क्षेत्र ओबीसी महिलेकरिता राखीव ठेवण्यात आला आहे. कोरची तालुक्यातील निवडणूक पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सद्य:स्थितीत बेडगाव-कोटगूल क्षेत्रातून पद्माकर मानकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर कोटरा-बिहिटेकला क्षेत्रातून मागीलवेळी सुनंदा आतला या युवाशक्तीच्याच उमेदवार निवडून आल्या होत्या. गडचिरोली जिल्ह्यातील युवाशक्ती आता शिवसेनेमध्ये विलीन झाले आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रामधून शिवसेनेचेच उमेदवार उभे केले जाणार आहेत. कोरची तालुक्यातील गोंड समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘ग्रामसभा’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरची तालुक्यात गोंड समाजातील मतदारांची संख्या मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ग्रामसभा या पक्षाने शक्तीनिशी प्रचार केल्यास राष्ट्रीय पक्षांसमोरील अडचण वाढण्याची शक्यता आहे. २००७ मध्ये कोरची तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसच्या ज्योती भैसारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण निकोडे हे उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. कोरची पंचायत समितीतही एकूण चार उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला होता. या पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर मात करीत युवाशक्तीने आपला जम बसविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जुना गड आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच विधानसभा व लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपासाठी अनुकूल वातारण तयार झाले. याचा फायदा उचलण्याची तयारी भाजपाने केली आहे. युवाशक्तीच्या माध्यमातून तयार झालेला गड आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.