शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांचा मूकमोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

By admin | Updated: October 3, 2016 02:11 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरलेला जिल्हाभरातील पत्रकारांचा मूकमोर्चा रविवारी प्रशासकीय यंत्रणा व अवघ्या समाजमनाचे लक्ष वेधणारा ठरला.

हक्कासाठी शेकडो पत्रकार उतरले रस्त्यावर : पत्रकार संरक्षण कायदा संमत करून पेंशन लागू करागडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरलेला जिल्हाभरातील पत्रकारांचा मूकमोर्चा रविवारी प्रशासकीय यंत्रणा व अवघ्या समाजमनाचे लक्ष वेधणारा ठरला. विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकारांसह ग्रामीण भागातील शेकडो बातमीदार रविवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मूकमोर्चाच्या निमित्त्याने रस्त्यावर उतरले आणि या शिस्तबध्द मोर्चाने स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तिथे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या अनुपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये पत्रकारांसाठी संरक्षण कायदा, पेन्शनचा मुद्दा प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आला आहे.विविध क्षेत्रासह समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने लेखणीच्या माध्यमातून लढा देणाऱ्या आमच्या पत्रकारांच्या मागण्यांकडे शासन व सरकारने संवेदनशीलतेने लक्ष द्यावे, असा सूर या मोर्चादरम्यान उमटला. राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून हितसंबंधियांकडून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा सातत्याने होत असलेला प्रयत्न आणि ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्यास सरकार करीत असलेली टाळाटाळ याचा निषेध करण्यासाठी राज्यातील पत्रकारांनी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या नेतृत्वात रविवारी राज्यभर मूकमोर्चे काढले. त्यानुसार गडचिरोली येथे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मूकमोर्चा काढण्यात आला. या आंदोलनास पत्रकारांच्या बहुसंख्य संघटनांनी पाठिंबा दिला. त्यात गडचिरोली प्रेस क्लब, गडचिरोली जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, गडचिरोली जिल्हा पत्रकार संघ व अन्य तालुका पत्रकार संघटनांचा सहभाग होता.स्थानिक इंदिरा गांधी चौकातून या मूकमोर्चास सुरवात झाली. अतिशय शिस्तबध्द व शांततेच्या मार्गाने हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकारांसह ग्रामीण भागातील अनेक बातमीदार यात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांना पत्रकारांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांची सभा पार पडली. त्यात पत्रकारांनी आपापले अनुभव कथन करून पत्रकारांचे प्रश्न मांडले. तसेच ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली, हेमंत डोर्लीकर, अरविंदकुमार खोब्रागडे, अविनाश भांडेकर यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार अलाउद्दीन लालानी, अनिल धामोडे, सुरेश नगराळे, विलास दशमुखे, रुपराज वाकोडे, कृष्णा मस्के, नंदकिशोर पोटे, मनीष कासर्लावार, दिलीप दहेलकर, रवी रामगुंडेवार, शालिकराम कराडे, लोमेश बुरांडे, पांडुरंग कांबळे, सिराज पठाण, श्रीधर दुग्गीरालापाटी नीलेश पटले, रवींद्र मोगिलवार, प्रमोद गेडेकर, चंद्रशेखर कोटगले, सुनील कावळे, रितेश वासनिक, किशोर मेश्राम, विष्णू वैरागडे, गजानन बारसागडे, विजयकुमार भैसारे, विलास ढोरे, राम लांजेवार, बंडू लांजेवार, क्रिष्णा चौधरी, इलियास खान पठाण, उमेश गझलपल्लीवार, श्रीकांत तेलकुंटलवार, रंगय्या रेपाकवार, नंदकिशोर वैरागडे, समीर कुरेशी, नासीर हाशमी, सीताराम बडोदे, अनिल गुरनुले, सुरेंद्र अलोणे, जावेद अली, अखिल कोलपकवार, श्याम दुल्लम, रवी कलकोटा, अमित तिपट्टी, वसंत तोकला, अमित साखरे यांच्यासह जिल्हाभरातील बातमीदार उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)