शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

संक्रांतीदरम्यान सकारात्मक संवाद करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:23 PM

संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा.

ठळक मुद्देदातृत्वाची भावना जागृत करणारा सण

संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा. संवाद हे जगातील सर्वात महत्त्वाचे चलन आहे. पैशाने व्यवहार होतो. मात्र संवादाने तो घडून येतो. संक्रांतीच्या निमित्ताने महिलांना व्यक्त होता येते, नाती जपण्याचे कौशल्य प्राप्त होते. भावनांना मोकळी वाट करून देता येत असल्याने मन स्वच्छ व निर्मळ राहण्यास मदत होते. संवादाने संवेदनशील मनांचे मिलन होते. महिलांमध्ये ऊर्जा, प्रेम, सहनशिलता, सृजनशिलता अशा अनेक गोष्टी दडल्या आहेत. या सर्व गोष्टींचा उपयोग विधायक कामांसाठी होऊ शकतो. स्त्रीमध्ये मातृत्व व दातृत्व राहते. वाणाच्या निमित्ताने दातृत्वाची भावना प्रकर्षाने जागृत होते. प्रत्येकाने प्रेमाने बोलले पाहिजे. समाजात क्रांती, बदल संवादाच्या माध्यमातून होऊ शकते. प्रेम हे जगण्याचे तत्व आहे. प्रेमळ संवादाचा कुटुंब व समाजाला फायदा होतो. मनातील गैरसमज, राग, द्वेष आणि त्यातून उद्भवणारा वाद टाळायचा असेल तर संवाद गरजेचा आहे. संवादाने माणूस खुलतो, फुलतो आणि आनंदी होतो. यामुळे संपूर्ण जग आनंदी राहते, एवढी ताकद संवादामध्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. संवादाच्या माध्यमातून विचारांचे संघटन होते. जिच्याकडे पण..‘ती’ म्हणून पाहिले जाते, संवादाच्या माध्यमातून ती काळोख दूर करणारी पणती निर्माण होऊ शकते.सविता सादमवारमुख्याध्यापिका, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट तथा जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष, संचालिका, पणती संस्था