शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचे चारित्र्य पाहिले जाते का ? वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिक चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:58 IST

लहान कंपन्यांमध्ये बगल : परस्पर केली जाते नेमणूक

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मोठमोठ्या शहरांत कंपन्यांमध्ये कामगार वा कर्मचाऱ्यांची भरती करताना चारित्र्य पडताळणी करण्यात येते. त्यानंतरच सदर कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात निवडक कंपन्या आहेत. या ठिकाणी कर्मचारी भरती करताना त्यांची चारित्र्य पडताळणी होत असली तरी लहान कंपन्यांमध्ये चारित्र्य पडताळणी केली जात नाही.

जिल्ह्यात सुरजागड लोहप्रकल्प व कोनसरी येथील स्टील प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य मोठे प्रकल्प नाहीत. खासगी कंपन्यांचे उद्योगधंदे बोटावर मोजण्याएवढेच आहेत. विशेष म्हणजे, सुरक्षा रक्षक म्हणून विविध कंपन्यांतर्गत कामगार विविध आस्थापनांमध्ये पुरवले जातात. यामध्ये बँका, विद्यापीठ, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, तसेच महिला व बालरुग्णालय आदी आस्थापनांचा समावेश आहे.

या ठिकाणी कामगार पुरवण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतलेले असले तरी लहान कंपन्यांमध्ये कामगारांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतले जात नाही. अशी स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे.

६०% कर्मचाऱ्यांची नेमणूक चारित्र्य प्रमाणपत्राशिवाय केली जाते. ४० टक्केच कर्मचाऱ्यांची नेमणूक विविध कंपन्यांमध्ये चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर होते.

पोलिस ठाण्यात होते चारित्र्य पडताळणी चारित्र्य पडताळणी करण्यासाठी संबंधित व्यक्तीला त्याच्या हद्दीतील पोलिस ठाण्यात अर्ज करावा लागतो. येथे अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीचा जुना रेकॉर्ड तपासला जातो किंवा त्या व्यक्तीच्या नावे काही गुन्हे आहेत काय, हे तपासले जाते. त्यानंतरच कामावर नेमणूक केली जाते.

चारित्र्य पडताळणी आवश्यक का ? कंपनी किंवा अन्य शासकीय आस्थापनांमध्ये कामगारांची नेमणूक करताना सदर कामगाराची पार्श्वभूमी काय आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा तर नाही ना, आदी कारणांचा शोध घेण्यासाठी चारित्र्य पडताळणी केली जाते.

जिल्ह्यात गुन्हेगारी नियंत्रणात मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत किंवा विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत येथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. सामाजिक सलोखा असल्याने गावखेड्यांसह शहरातही वातावरण शांत असते.

या पदांसाठी करतात चारित्र्य पडताळणी 

  • कंपन्या किंवा शासकीय आस्थापनांमध्ये सुरक्षारक्षक, कामगार, शासकीय सेवक आदी पदांवर नेमणुकीसाठी संबंधित व्यक्तीचे चारित्र्य तपासले जाते. 
  • याकरिता त्या व्यक्तीकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागविले जाते. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तर त्या व्यक्तीला सेवेत घेतले जात नाहीत.
  • सदर पडताळणीमुळे कामगाराची विश्वसनीयता तपासली जाते.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी