शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

कामगारांचे चारित्र्य पाहिले जाते का ? वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिक चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:58 IST

लहान कंपन्यांमध्ये बगल : परस्पर केली जाते नेमणूक

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मोठमोठ्या शहरांत कंपन्यांमध्ये कामगार वा कर्मचाऱ्यांची भरती करताना चारित्र्य पडताळणी करण्यात येते. त्यानंतरच सदर कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात निवडक कंपन्या आहेत. या ठिकाणी कर्मचारी भरती करताना त्यांची चारित्र्य पडताळणी होत असली तरी लहान कंपन्यांमध्ये चारित्र्य पडताळणी केली जात नाही.

जिल्ह्यात सुरजागड लोहप्रकल्प व कोनसरी येथील स्टील प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य मोठे प्रकल्प नाहीत. खासगी कंपन्यांचे उद्योगधंदे बोटावर मोजण्याएवढेच आहेत. विशेष म्हणजे, सुरक्षा रक्षक म्हणून विविध कंपन्यांतर्गत कामगार विविध आस्थापनांमध्ये पुरवले जातात. यामध्ये बँका, विद्यापीठ, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, तसेच महिला व बालरुग्णालय आदी आस्थापनांचा समावेश आहे.

या ठिकाणी कामगार पुरवण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतलेले असले तरी लहान कंपन्यांमध्ये कामगारांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतले जात नाही. अशी स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे.

६०% कर्मचाऱ्यांची नेमणूक चारित्र्य प्रमाणपत्राशिवाय केली जाते. ४० टक्केच कर्मचाऱ्यांची नेमणूक विविध कंपन्यांमध्ये चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर होते.

पोलिस ठाण्यात होते चारित्र्य पडताळणी चारित्र्य पडताळणी करण्यासाठी संबंधित व्यक्तीला त्याच्या हद्दीतील पोलिस ठाण्यात अर्ज करावा लागतो. येथे अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीचा जुना रेकॉर्ड तपासला जातो किंवा त्या व्यक्तीच्या नावे काही गुन्हे आहेत काय, हे तपासले जाते. त्यानंतरच कामावर नेमणूक केली जाते.

चारित्र्य पडताळणी आवश्यक का ? कंपनी किंवा अन्य शासकीय आस्थापनांमध्ये कामगारांची नेमणूक करताना सदर कामगाराची पार्श्वभूमी काय आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा तर नाही ना, आदी कारणांचा शोध घेण्यासाठी चारित्र्य पडताळणी केली जाते.

जिल्ह्यात गुन्हेगारी नियंत्रणात मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत किंवा विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत येथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. सामाजिक सलोखा असल्याने गावखेड्यांसह शहरातही वातावरण शांत असते.

या पदांसाठी करतात चारित्र्य पडताळणी 

  • कंपन्या किंवा शासकीय आस्थापनांमध्ये सुरक्षारक्षक, कामगार, शासकीय सेवक आदी पदांवर नेमणुकीसाठी संबंधित व्यक्तीचे चारित्र्य तपासले जाते. 
  • याकरिता त्या व्यक्तीकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागविले जाते. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तर त्या व्यक्तीला सेवेत घेतले जात नाहीत.
  • सदर पडताळणीमुळे कामगाराची विश्वसनीयता तपासली जाते.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी