शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भेंडाळा परिसरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 5:00 AM

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत उदासीन असतात. त्यामुळे येथील रस्त्यांची चाळण होते. कुठे तरी त्यावर डांबर आणि खडी दिसत असते. पावसाळ्यात मात्र या भागातील अंतर्गत रस्त्यांना जोरदार फटका बसून दुरवस्थेत भर पडते.

ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : वाहनधारक त्रस्त; पावसाळ्यात आवागमनास होणार अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे नवीन रस्त्यांचीही वाट लागली. खड्डेमय झालेल्या रस्त्यांची डागडुजी यावर्षीच्या उन्हाळ्यात करणे अपेक्षित होते. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या भेंडाळा परिसरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याशिवाय गावातील अंतर्गत रस्ते दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत उदासीन असतात. त्यामुळे येथील रस्त्यांची चाळण होते. कुठे तरी त्यावर डांबर आणि खडी दिसत असते. पावसाळ्यात मात्र या भागातील अंतर्गत रस्त्यांना जोरदार फटका बसून दुरवस्थेत भर पडते. भेंडाळा परिसरातील अनेक अंतर्गत रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. तेलतून तुकूम ते एकोडी मार्ग तसेच वेलतूर तुकूम ते कळमगाव, सगनापूर ते नवेगाव माल, कान्होली ते मुरखळा, भेंडाळा ते रामाळा, दोटकुली बसस्टॉप ते वाघोली, भेंडाळा ते वेलतुर तुकूम, फोकुर्डी ते नवेगाव माल या सर्व रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर डांबर टाकल्यानंतर चाळण होईपर्यंत लक्ष दिले जात नाही. रस्त्यांबाबत लोकांच्या जेव्हा तक्रारी येतात तेव्हाच प्रशासनाला जाग येते. या परिसरातील काही रस्त्यांवर तर अद्याप एकदाही डांबर पडलेले नाही. असे रस्ते सुध्दा या परिसरात बघायला मिळतात. अशी गंभीर परिस्थिती ग्रामीण भागातील रस्त्यांची आहे. या भागांतील अगदी थोडेच रस्ते चांगले आहेत पण ते देखील दरवर्षीच्या पावसाळ्यात उखडून जाण्याची भीती असते. या गावांतील अंतर्गत रस्तेदेखील मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यांचे नव्याने खडीकरण करावे, अशी मागणी भेंडाळा परिसरातील नागरिकांनी केली आहे.अरूंद रस्त्यांच्या कडा भरण्याची मागणीभेंडाळा परिसरातील ग्रामीण भागात जाणारे रस्ते अरूंद आहेत. या रस्त्यांच्याही कडा खोलगट आहेत. मात्र कडांवर मुरूम टाकण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मार्र्कंडाकडे जाणाऱ्या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यांच्या कडा भरणे आवश्यक आहे. आधीच अरूंद असलेले रस्ते वाहतुकीस अडसर ठरत असतानाच कडा खोलगट झाल्याने अपघाताचा धोका आहे.परिसरातील रस्त्यांच्या वळणावर दुतर्फा झुडपे वाढली असल्याने विरूद्ध दिशेने येणारे वाहन दृष्टीस पडत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेली विशेषत: वळणावरील झुडपे तोडणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून झुडपे तोडावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा