लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक आगाराने काही प्रमाणात बससेवा सुरू केली आहे. यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांना कामावर बोलविले जात आहे. यवतमाळ, अमरावती, नागपूर या ठिकाणी राहात असलेले एसटी कर्मचारी गडचिरोली जिल्ह्यात अनधिकृतपणे प्रवेश करून कर्तव्यावर रूजू होत आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका निर्माण वाढण्याची शक्यता आहे.लॉकडाऊन शिथील केल्यानंतर एसटीने काही प्रमाणात बससेवा सुरू केली आहे. सर्वांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी चालक व वाहकांच्या आगारामार्फत आळीपाळीने ड्युटी लावली जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत काही एसटी कर्मचारी गावाकडे गेले हो ते. ते त्याच ठिकाणी अडकून पडले होते. कर्तव्यावर रूजू होण्यासाठी ते गडचिरोली जिल्ह्यात अनधिकृतरित्या प्रवेश करून कर्तव्यावर रूजू होत आहेत. एखाद्या एसटीच्या अधिकाºयाने अधिवासाविषयी विचारणा केल्यास आपण गडचिरोलीतच राहत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, सदर कर्मचारी कोरोना संवेदनशील जिल्ह्यांमधून येत आहेत. गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार बाहेर जिल्ह्यातून येणाºया प्रत्येक व्यक्तीला १४ दिवस क्वॉरंटाईन असणे आवश्यक आहे. मात्र सदर कर्मचारी क्वॉरंटाईन न राहताच थेट कर्तव्यावर रूजू होत आहेत. अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.गडचिरोली जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या लक्षात घेतली तर बहुतांश नागरिक हे दुसºया जिल्ह्यातून आलेले आहेत. प्रशासनाने खबरदारी घेत त्यांना संस्थात्मक विलगीकरण केल्याने दुसºया व्यक्तीला कोरोनाचा प्रसार झाला नाही. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या अजुनही मर्यादित आहे. मात्र परवानगी व तपासणीशिवाय जिल्ह्यात दा खल होणाºया एसटी कर्मचाºयांमुळे कोरोनावाढीचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, सदर कर्मचारी एसटी घेऊन जात असल्याने एसटीतील कित्येक कर्मचाºयांना कोरोनाचा धोका आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा आंतरजिल्हा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST
लॉकडाऊन शिथील केल्यानंतर एसटीने काही प्रमाणात बससेवा सुरू केली आहे. सर्वांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी चालक व वाहकांच्या आगारामार्फत आळीपाळीने ड्युटी लावली जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत काही एसटी कर्मचारी गावाकडे गेले हो ते. ते त्याच ठिकाणी अडकून पडले होते. कर्तव्यावर रूजू होण्यासाठी ते गडचिरोली जिल्ह्यात अनधिकृतरित्या प्रवेश करून कर्तव्यावर रूजू होत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा आंतरजिल्हा प्रवेश
ठळक मुद्देप्रशासनाची दिशाभूल : दुसऱ्या जिल्ह्यातून कर्मचारी येत असल्याने होऊ शकतो धोका