शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

किडींचे एकात्मिक नियंत्रण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : ढगाळ वातावरण, अधिक आर्द्रता, शेतातील साचलेले पाणी, अनियमित पाऊस यामुळे धानपिकावर गादमाशी, खोडकिडा, तुडतुडे ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांना सल्ला; कृषी अधिकारी पोहोचले शेताच्या बांधावर

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ढगाळ वातावरण, अधिक आर्द्रता, शेतातील साचलेले पाणी, अनियमित पाऊस यामुळे धानपिकावर गादमाशी, खोडकिडा, तुडतुडे आदी कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला.आरमोरी तालुक्यातील वैरागड, सुकाळा, मोहझरी, पिसेवडधा येथील शेतात कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन धानपिकावर प्रादुर्भाव झालेल्या खोडकिडा, गादमाशी, तुडतुडे आदींची पाहणी केली. पिकावरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे. परिसरात चार ते पाच शेतकरी असल्यास पाचही शेतकऱ्यांनी एक-दोन दिवसाच्या आड पिकावर फवारणी करावी. तेव्हाच कीड नियंत्रण होऊ शकते. पूर्ण वाढ झालेली कीड एका दिवसात २०० अंडी घालते. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो. रोग नियंत्रणात आणण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे तालुका कृषी अधिकारी टी.डी.ढगे यांनी सांगितले.रोवणी करताना अनेक शेतकरी दाटीने रोवणी करतात. त्यामुळे धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो. किडीचा प्रादुर्भाव झाला तर त्यांचे व्यवस्थापन करण्यास अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी श्री पद्धत किंवा पट्टा पद्धतीने धानाची रोवणी करावी, असे सांगण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी संदीप ढोणे, तालुका कृषी पर्यवेक्षक जी.एन.जाधवर व शेतकरी उपस्थित होते.उत्पादनात घटीची शक्यतायावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पेरणी केल्यानंतर तब्बल दीड महिने तर काही भागात दोन महिन्यांनी पाऊस बरसला. हलक्या व मध्यम प्रतीच्या धानाचा निम्मा कालावधी उलटला. त्यानंतर शेतकऱ्यांनी रोवणी केली. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात धानपिकाचा निसवा व्हायचा. परंतु यावर्षी अनेक भागात आताही रोवणी सुरू आहे. त्यामुळे हलक्या व मध्यम प्रतीच्या धानाच्या उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती