शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी 20 मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST

गेल्या २४ तासात कोरोनाने बळी घेतलेल्या २० पैकी १४ जणांच्या मृतदेहांवर मंगळवारी गडचिरोलीच्या स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले. पहिल्यांदाच एकावेळी एवढ्या प्रेतांवर अंतिम संस्कार करण्याची वेळ नगर परिषदेकडून नियुक्त संबंधित कर्मचाऱ्यांवर आली. यासाठी स्मशानभूमीत जागा कमी पडल्याने कठाणी नदीच्या दोन्ही तिरांवर योग्य जागा मिळेल तिथे सरण रचावे लागले. 

ठळक मुद्देअग्निसंस्कारासाठी जागा पडली अपुरी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अवघ्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल २० जणांचा बळी घेतला. यातील अर्ध्याहून अधिक लोक दुसऱ्या जिल्ह्यातील असले तरी ते उपचार घेण्यासाठी गडचिरोलीत दाखल झाले होते. मृत्यूच्या या तांडवासोबतच नव्याने कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांनीही मंगळवारी विक्रमी, म्हणजे एकाच दिवशी ३७० चा आकडा गाठला. आतापर्यंतच्या कोरोनाकाळातील ही जिल्ह्यातील सर्वाधिक भीषण स्थिती ठरली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यासाठी ११ महिने झाले आहेत. पण कोरोना पॉझिटिव्हचा आकडा इतका कधीच फुगला नाही. १५ दिवसांपूर्वीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारच्या वर कधीच गेली नव्हती. मात्र गेल्या १५ दिवसात मृत्यू आणि नवीन बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. आता सक्रिय रुग्ण २ हजारच्या उंबरठ्यावर पोहोचले असून सध्या त्यांची संख्या १९११ आहे. या भिषण स्थितीतही मंगळवारी गडचिराेलीचे मार्केट सुरू हाेते.नवीन ३७० बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १५०, अहेरी तालुक्यातील २३, आरमोरी २०, भामरागड तालुक्यातील १९, चामोर्शी तालुक्यातील २०, धानोरा तालुक्यातील २६,  एटापल्ली तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील ११,  कुरखेडा  तालुक्यातील बाधितामध्ये २१, मुलचेरा तालुक्यातील ५, सिरोंचा तालुक्यातील ३५ तर वडसा तालुक्यातील ३० जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या १०८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४४, अहेरी १०, आरमोरी २, मुलचेरा १, भामरागड २०, चामोर्शी ८, धानोरा १, सिरोंचा ३, कोरची २, कुरखेडा ३ तसेच देसाईगंज तालुक्यातील १४ जणांचा समावेश आहे.

अग्निसंस्कारासाठी जागा पडली अपुरी 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या २४ तासात कोरोनाने बळी घेतलेल्या २० पैकी १४ जणांच्या मृतदेहांवर मंगळवारी गडचिरोलीच्या स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले. पहिल्यांदाच एकावेळी एवढ्या प्रेतांवर अंतिम संस्कार करण्याची वेळ नगर परिषदेकडून नियुक्त संबंधित कर्मचाऱ्यांवर आली. यासाठी स्मशानभूमीत जागा कमी पडल्याने कठाणी नदीच्या दोन्ही तिरांवर योग्य जागा मिळेल तिथे सरण रचावे लागले. जिल्ह्यात कोरोनाने १५७ जणांचा बळी घेतला आहे. मंगळवारी नोंद केलेल्या २० मृत्यूंपैकी दहा  गडचिरोली जिल्ह्यातील, सात चंद्रपूर जिल्ह्यातील तर यवतमाळ, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. त्यांच्यावर गडचिरोलीत अंत्यसंस्कार केले जात आहे.गडचिरोली जिल्ह्यातील मृतांमध्ये शहरातील गोकुलनगरातील ६४ वर्षीय महिला, कलेक्टर कॉलनीतील ७८ वर्षीय महिला, आरमोरीतील ५२ वर्षीय पुरुष, विसोरा, ता.देसाईगंज येथील ४० वर्षीय पुरुष, देसाईगंजमधील ५७ वर्षीय महिला, विहीरगाव येथील पुरुष, एक महिला, एकलापूर येथील ५७ वर्षीय पुरुष, कुरखेडा येथील ६०वर्षीय पुरुष, नवेगाव कॉम्प्लेक्स येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मृतांमध्ये ६४ व ६५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, २७ वर्षीय आणि ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ५५ वर्षीय महिला, नागपूरची ५० वर्षीय पुरुष आणि भंडारा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू