शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांत केंद्रीय पथकाकडून पीक नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 20:57 IST

Gadchiroli News जुलै महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकांनी मंगळवारी या दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पाहणी केली.

ठळक मुद्दे सिंराेचाला पोहोचण्यासाठी हेलिकाॅप्टरचा वापरशेतकऱ्यांशी साधला संवाद

गडचिरोली/ वर्धा : जुलै महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकांनी मंगळवारी या दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पाहणी केली. केंद्रीय पथकातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील दहा गावांत जाऊन केली. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीसह शेतकरी, नुकसानग्रस्त व अधिकाऱ्यांशी संवाद साधून नुकसानीबाबतची अधिकचीही माहिती जाणून घेतली.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नदीच्या पुरामुळे बसलेल्या फटक्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मंगळवारी गडचिरोलीत दाखल झाले. तीन अधिकाऱ्यांच्या या पथकाने हेलिकॉप्टरने सिरोंचा येथे जाऊन काही शेतात पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या पथकात अर्थ मंत्रालयाचे उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी विभागाचे संचालक ए. एल. वाघमारे, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांचा समावेश आहे. पुरादरम्यान १० हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करावे लागले होते. शेती, घरे, रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने सिरोंचा तालुक्यातील आरडा, मुगापूर व मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. तसेच सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. या मार्गावरील गोदावरी नदीवर असलेल्या पुलाची एक कडा पुरात वाहून गेली होती.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अहेरीचे उपविभागीय दंडाधिकारी श्री अंकित, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी आणि तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पूरबाधित नागरिकांशी साधला संवाद

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा तालुक्यातील नुकसानीबाबत पथकातील सदस्यांना माहिती दिली. यावेळी पथकातील सदस्यांनी गावातील उपस्थित शेतकरी व नागरिक यांच्याशी झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. उपस्थित शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना शेतीसह झालेल्या जनावरांच्या हानीबाबत माहिती दिली. शेताच्या बांधावर जाऊनही पथकातील सदस्यांनी पाहणी केली. याबाबतचा अहवाल केंद्राकडे सादर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बोरगावच्या शेतकऱ्याने साधला इंग्रजी, हिंदी अन् मराठीत संवाद

विशेष म्हणजे देवळी तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी प्रशांत निमसडकर यांनी एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय अधिकाऱ्याप्रमाणेच सुरुवातीला इंग्रजी, नंतर हिंदी, तर नंतर मराठी भाषेत केंद्रीय पथकातील बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून अतिवृष्टीमुळे ओढावलेली पूरस्थिती व नुकसानीची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव राजीव शर्मा यांच्या नेतृत्वातील पथकात जलशक्ती मंत्रालयाचे संचालक गिरीश उंबरजे, ग्रामविकास मंत्रालयाचे संचालक डॉ. माणिकचंद्र पंडित, ऊर्जा मंत्रालयाच्या सहायक संचालक मीना हुड्डा यांचा समावेश होता.

पथकासोबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, वर्धा येथील उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, हिंगणघाट येथील उपविभागीय महसूल अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे यांच्यासह सेलू, वर्धा, देवळी, हिंगणघाट तसेच समुद्रपूरचे तहसीलदार आदींची उपस्थिती होती. हिंगणघाट येथील विश्रामगृहात भाजपचे आमदार समीर कुणावार यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली.

 

 

टॅग्स :agricultureशेती