शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांत केंद्रीय पथकाकडून पीक नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 20:57 IST

Gadchiroli News जुलै महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकांनी मंगळवारी या दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पाहणी केली.

ठळक मुद्दे सिंराेचाला पोहोचण्यासाठी हेलिकाॅप्टरचा वापरशेतकऱ्यांशी साधला संवाद

गडचिरोली/ वर्धा : जुलै महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकांनी मंगळवारी या दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पाहणी केली. केंद्रीय पथकातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील दहा गावांत जाऊन केली. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीसह शेतकरी, नुकसानग्रस्त व अधिकाऱ्यांशी संवाद साधून नुकसानीबाबतची अधिकचीही माहिती जाणून घेतली.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नदीच्या पुरामुळे बसलेल्या फटक्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मंगळवारी गडचिरोलीत दाखल झाले. तीन अधिकाऱ्यांच्या या पथकाने हेलिकॉप्टरने सिरोंचा येथे जाऊन काही शेतात पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या पथकात अर्थ मंत्रालयाचे उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी विभागाचे संचालक ए. एल. वाघमारे, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांचा समावेश आहे. पुरादरम्यान १० हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करावे लागले होते. शेती, घरे, रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने सिरोंचा तालुक्यातील आरडा, मुगापूर व मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. तसेच सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. या मार्गावरील गोदावरी नदीवर असलेल्या पुलाची एक कडा पुरात वाहून गेली होती.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अहेरीचे उपविभागीय दंडाधिकारी श्री अंकित, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी आणि तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पूरबाधित नागरिकांशी साधला संवाद

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा तालुक्यातील नुकसानीबाबत पथकातील सदस्यांना माहिती दिली. यावेळी पथकातील सदस्यांनी गावातील उपस्थित शेतकरी व नागरिक यांच्याशी झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. उपस्थित शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना शेतीसह झालेल्या जनावरांच्या हानीबाबत माहिती दिली. शेताच्या बांधावर जाऊनही पथकातील सदस्यांनी पाहणी केली. याबाबतचा अहवाल केंद्राकडे सादर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बोरगावच्या शेतकऱ्याने साधला इंग्रजी, हिंदी अन् मराठीत संवाद

विशेष म्हणजे देवळी तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी प्रशांत निमसडकर यांनी एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय अधिकाऱ्याप्रमाणेच सुरुवातीला इंग्रजी, नंतर हिंदी, तर नंतर मराठी भाषेत केंद्रीय पथकातील बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून अतिवृष्टीमुळे ओढावलेली पूरस्थिती व नुकसानीची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव राजीव शर्मा यांच्या नेतृत्वातील पथकात जलशक्ती मंत्रालयाचे संचालक गिरीश उंबरजे, ग्रामविकास मंत्रालयाचे संचालक डॉ. माणिकचंद्र पंडित, ऊर्जा मंत्रालयाच्या सहायक संचालक मीना हुड्डा यांचा समावेश होता.

पथकासोबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, वर्धा येथील उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, हिंगणघाट येथील उपविभागीय महसूल अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे यांच्यासह सेलू, वर्धा, देवळी, हिंगणघाट तसेच समुद्रपूरचे तहसीलदार आदींची उपस्थिती होती. हिंगणघाट येथील विश्रामगृहात भाजपचे आमदार समीर कुणावार यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली.

 

 

टॅग्स :agricultureशेती