लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : लॉकडाऊन व संचारबंदीत २० एप्रिल नंतर काही प्रमाणात सूट मिळणार या गैरसमजुतीतून अनेकजण रस्त्याने वाहनासह सर्रास फिरू लागले. रस्त्यावरील वाहतूक अचानक वाढल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच भामरागडात पुन्हा प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्यास सुरूवात झाली आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला थांबवून चौकशीनंतरच सोडले जात आहे.लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण रस्त्याने फिरणाºया नागरिकांची संख्या घटली होती. तालुक्यातील गावांमध्ये नागरिकांनी गावबंदी करून बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारल्याने येथे संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी झाली. परंतु २० एप्रिल नंतर अनेकजण रस्त्याने सर्रास फिरू लागले. अचानक वाहनांच्या संख्येत वाढ झाली. सदर बाब लक्षात येताच तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवने, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सूरज जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर पर्लकोटा नदीकिनाºयावर पोलीस बंदोबस्त लावला.प्रत्यक्ष तहसीलदार, एसडीपीओ, मुख्याधिकारी यांनी प्रवेश नाक्याजवळ भेट देऊन पाहणी केली. भामरागड येथे प्रवेश करणाºया प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहनाची तपासणी तसेच वाहनधारकाची विचारपूस करून तसेच त्यांच्या नावाची नोंदणी करूनच पुढे सोडले जात आहे. याशिवाय आरोग्य तपासणी करण्याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.विशेष म्हणजे, जोनावारा, मरमपल्ली, कुडकेली, केडमार येथील नागरिक तेलंगणा राज्यातून मिरची तोडून स्वगावी परतल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे गाव गाठून त्यांना विलगीकरणात ठेवले. महसूल, पोलीस व नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगली जात आहे. ठाणेदार संदीप भांड यांच्या नेतृत्त्वात पोलीस कर्मचारी दिवसरात्र गस्त घालत आहेत.
आवागमन वाढल्याने चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST
लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण रस्त्याने फिरणाºया नागरिकांची संख्या घटली होती. तालुक्यातील गावांमध्ये नागरिकांनी गावबंदी करून बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारल्याने येथे संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी झाली. परंतु २० एप्रिल नंतर अनेकजण रस्त्याने सर्रास फिरू लागले. अचानक वाहनांच्या संख्येत वाढ झाली.
आवागमन वाढल्याने चौकशी
ठळक मुद्देभामरागड पोलीस सतर्क : वाहनधारकाची केली जातेय विचारपूस