शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वनवे थांबविण्यासाठी वनविभागाची नाविण्यपूर्ण उपाययाेजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST

जंगलांना आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह फुलाचा हंगाम सुरू झाला की मोहफुलं वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा करतात. त्या कचऱ्याला त्याच ठिकाणी जाळून तो न वीजवता घरी निघून जातात. ही आग पसरत जाऊन संपूर्ण जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी येते. यात वनांचे आणि वन्यजीवांचे फार मोठी हानी होते. दरवर्षी लागणाऱ्या हानीमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी हाेते. हे टाळण्यासाठी या वर्षात वन विभागाने स्वतः मोह फुलाच्या झाडा खालील पालापाचोळा ब्लोअर मशीनद्वारे गाेळा केला जात आहे.

ठळक मुद्देब्लाेअर मशीनने कचऱ्याची विल्हेवाट, आग लावणाऱ्यांवर हाेणार कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : मार्च महिना सुरू  झाल्यानंतर जंगलांनाआगी लागण्याचे प्रकार आणि जिल्ह्यात मोहफुल वेचणीचा हंगाम लक्षात घेता जंगलांनाआगी लागण्याचे प्रमाण वाढू नये म्हणून वनविभागाने झाडाखालील पालापाचोळा ब्लोअर मशीनद्वारे नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली आहे वैरागड उपवन क्षेत्रात ही मोहीम वन विभागाचे अधिकारी कर्मचारी राबवितत आहेत. जंगलांना आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह फुलाचा हंगाम सुरू झाला की मोहफुलं वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा करतात. त्या कचऱ्याला त्याच ठिकाणी जाळून तो न वीजवता घरी निघून जातात. ही आग पसरत जाऊन संपूर्ण जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी येते. यात वनांचे आणि वन्यजीवांचे फार मोठी हानी होते. दरवर्षी लागणाऱ्या हानीमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी हाेते. हे टाळण्यासाठी या वर्षात वन विभागाने स्वतः मोह फुलाच्या झाडा खालील पालापाचोळा ब्लोअर मशीनद्वारे गाेळा केला जात आहे. नंतर ताे कचरा जाळून टाकण्याचा मोहीम उघडली आहे. स्वतः वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वन मजूर जंगलात असणाऱ्या मोहफुलाच्या झाडा खालील पालापाचोळा स्वतः नष्ट करीत आहेत. त्यामुळे लोकांना मोह फुलाखालील जागा स्वच्छ करण्यासाठी पालापाचोळ्याचे जाळण्याची गरज पडणार नाही. तरीही पालापाचाेळा स्वताहून जाळून ती आग जंगलात पसरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे पत्र वन विभागाने काढले आहे. वैरागड उपवन क्षेत्रात क्षेत्र सहायक साईनाथ सोनुले, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो, नारायण शिवरकर, प्रवीण धात्रक  वणव्यांना  प्रतिबंध घालण्यासाठी काळजी घेत आहेत. त्यामुळे वनव्यांचे प्रमाण यावर्षी कमी हाेईल, अशी अपेक्षा वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जंगलात गस्ती वाढल्या जंगलांना लागणाऱ्या आगीवर प्रतिबंध घालण्यासाठी वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी पहाटेपासूनच जंगलात गस्त घालत आहेत. गावागावात वनव्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांना याबाबत सूचना देऊन जंगलांना आगी लागण्याचे कोणी जर अघोरी कृत्य करत असेल तर त्याला तात्काळ वन विभागाला कळवावे यासाठी मोबाइल नंबर सुद्धा वन विभागाने प्रसिद्ध केले आहेत.  काही तेंदू ठेकेदार आपल्या मजुरांकरवी जंगलांना मुद्दाम आगी लावतात. अशा कंत्राटदारावरही कारवाई केली जााणार आहे.

 

टॅग्स :forestजंगलfireआग