शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

पाणीपट्टीत २०० रुपयेच वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

शहरातील सर्वच नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यासाठी पाणी पुरवठा योजनेत काही बदल करणे व दुरूस्ती करणे आवश्यक होते. वैनगंगा नदीवरून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यासाठी दोन पंप असणे आवश्यक आहे. मात्र एकाच पंपावर काम चालविले जात आहे. सदर पंप सुध्दा अतिशय जुना असल्याने पाणी कमी प्रमाणात पुरवठा करते.

ठळक मुद्देस्थायी समितीत निर्णय : नगर परिषद प्रशासनाने ११०० रुपये सुचविली होती वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावित अर्थसंकल्पात ११०० रुपये वाढ सुचविण्यात आली होती. सोमवारी स्थायी समितीची अर्थसंकल्पावर सभा झाली. या सभेत नगराध्यक्षांसह सर्वच सदस्यांनी ११०० रुपये वाढीस विरोध दर्शवून २०० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.शहरातील सर्वच नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यासाठी पाणी पुरवठा योजनेत काही बदल करणे व दुरूस्ती करणे आवश्यक होते. वैनगंगा नदीवरून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यासाठी दोन पंप असणे आवश्यक आहे. मात्र एकाच पंपावर काम चालविले जात आहे. सदर पंप सुध्दा अतिशय जुना असल्याने पाणी कमी प्रमाणात पुरवठा करते. या ठिकाणी दोन पंप बसविण्यासाठी ३० लाख रुपयांचा खर्च आहे. इतरही बाबींवर खर्च करावा लागणार असल्याने नगर परिषद प्रशासनाने ११०० रुपयांची वाढ सुचविली होती. मात्र नगराध्यक्षांसह स्थायी समितीच्या सदस्यांनी या वाढीला विरोध दर्शविला. सद्य:स्थितीत १३०० रुपये पाणी कर आहे. एका वेळेवर ११०० रुपये वाढविल्यास जवळपास दुप्पट पाणी कर नागरिकांना भरावा लागेल. हा बोझा नागरिकांना असह्य होईल. गरीब नागरिकांना पाणी कर भरणे कठीण होईल. ही बाब लक्षात घेऊन केवळ २०० रुपये वाढ करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्यामुळे आता २०० रुपयेच वाढ होईल, अशी शक्यता आहे. कारण स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाला पुन्हा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता लागते. सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर तो निर्णय शहरासाठी लागू होतो. मात्र सर्वसाधारण सभेत याला विरोध न होण्याची शक्यता आहे.लोकमतच्या वृत्ताने खळबळनगर परिषद प्रशासनाने पाणीपट्टीत ११०० रुपये वाढ करण्याचे अर्थसंकल्पात सुचविले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रकाशित केले. जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. दुप्पट करवाढ झाल्यास अनेक गरीब कुटुंब अडचणीत येतील, ही बाब पदाधिकाऱ्यांना पटवून दिली. त्यानंतर स्थायी समितीने केवळ २०० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Socialसामाजिक