शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

समाजात दातृत्वाची भावना वाढीस लागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 01:22 IST

आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या नागरिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून गोरगरीब, रंजलेल्या,

 मकरंद अनासपुरे यांचे मत : गडचिरोलीत कौशल्य प्रशिक्षण प्रभावी राबविण्याची गरज कुरखेडा : आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या नागरिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून गोरगरीब, रंजलेल्या, कष्टकरी व शेतकऱ्यांच्या वेदना आणि दु:ख समजून घ्यावे, अशा गरजू नागरिकांच्या कल्याणासाठी योगदान दिले पाहिजे, समाजात दातृत्वाची भावना वाढीस लागणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध मराठी सिनेकलावंत तथा ‘नाम’ संस्थेचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. कुरखेडा येथे मंगळवारी रात्री नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने ते आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आ. क्रिष्णा गजबे, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल उपस्थित होते. भविष्यात पर्यावरणाला होणाऱ्या हानीमुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच समाजात याबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. प्रशासकीय स्तरावरही याबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे, असे अनासपुरे यावेळी म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंद्यांचा अभाव आहे. दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रिकाम्या हाताने असलेले अनेक युवक वाम मार्गाकडे वळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातून अराजकताही निर्माण होऊ शकते. शासनस्तरावरून या युवकांना दिशा दाखवत रोजगाराची संधी निर्माण झाली पाहिजे, यासाठी शासन व प्रशासकीय स्तरावरून कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावी राबविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ‘नाम’ या सामाजिक संस्थेद्वारे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबी करण्यासाठी आर्थिक मदत पुरविण्यात येते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून संस्थेच्या वतीने काही शाळा सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. यापुढे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशपातळीवर ‘नाम’ या सामाजिक संस्थेद्वारे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीच्या रूपात आधार देण्यात येईल, शहीद जवानांच्या पाल्यांकरिता शैक्षणिक मदत पुरविण्यात येईल, अशी माहिती मकरंद अनासपुरे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)