शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

अपुऱ्या पावसाने पीक धोक्यात

By admin | Updated: August 19, 2014 23:43 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. परिणामी तलावांमध्ये ५० टक्क्यापेक्षाही कमी जलसाठा आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारल्याने धानपिकाच्या

गडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. परिणामी तलावांमध्ये ५० टक्क्यापेक्षाही कमी जलसाठा आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारल्याने धानपिकाच्या रोवणीचे कामे पूर्णपणे थांबली आहेत. तर दुसरीकडे रोवलेले धानपीक करपायला लागले असल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी होत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे ९४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर रोवणी व ५४ हजार ४६० हेक्टर क्षेत्रावर आवत्याचे नियोजन करण्यात आले होते. पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासूनच पावसाने धक्के द्यायला सुरूवात केली. आजपर्यंत केवळ सरासरी ६५८.४३ मीमी पाऊस पडला आहे. दरवर्षीच्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण निम्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे रोवणीचे कामेही लांबली आहेत. १६ आॅगस्टपर्यंत केवळ ७३ टक्के रोवणीचे कामे पूर्ण झाली आहेत. तर आवत्यालाही बाशी करणे व निंदा काढण्याचे काम शिल्लक आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. त्यामुळे रोवलेले धानपीक करपायला लागले आहेत. तलावांमध्ये जमा झालेल्या पाण्याच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी रोवणीचे कामे आटोपली आता हे तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. दिवसभर पडणाऱ्या कडक उन्हामुळे धानपीक करपायला लागले आहे. तर दुसरीकडे तलावामध्ये जलसाठा नसल्याने धानपिकाला जलसिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आतापासून पावसाने दडी मारल्यास संपूर्ण धानपीक धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याने बाराही तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ घोषीत करावा, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)