शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पावसाने पीक धोक्यात

By admin | Updated: August 19, 2014 23:43 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. परिणामी तलावांमध्ये ५० टक्क्यापेक्षाही कमी जलसाठा आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारल्याने धानपिकाच्या

गडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. परिणामी तलावांमध्ये ५० टक्क्यापेक्षाही कमी जलसाठा आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारल्याने धानपिकाच्या रोवणीचे कामे पूर्णपणे थांबली आहेत. तर दुसरीकडे रोवलेले धानपीक करपायला लागले असल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी होत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे ९४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर रोवणी व ५४ हजार ४६० हेक्टर क्षेत्रावर आवत्याचे नियोजन करण्यात आले होते. पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासूनच पावसाने धक्के द्यायला सुरूवात केली. आजपर्यंत केवळ सरासरी ६५८.४३ मीमी पाऊस पडला आहे. दरवर्षीच्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण निम्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे रोवणीचे कामेही लांबली आहेत. १६ आॅगस्टपर्यंत केवळ ७३ टक्के रोवणीचे कामे पूर्ण झाली आहेत. तर आवत्यालाही बाशी करणे व निंदा काढण्याचे काम शिल्लक आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. त्यामुळे रोवलेले धानपीक करपायला लागले आहेत. तलावांमध्ये जमा झालेल्या पाण्याच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी रोवणीचे कामे आटोपली आता हे तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. दिवसभर पडणाऱ्या कडक उन्हामुळे धानपीक करपायला लागले आहे. तर दुसरीकडे तलावामध्ये जलसाठा नसल्याने धानपिकाला जलसिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आतापासून पावसाने दडी मारल्यास संपूर्ण धानपीक धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याने बाराही तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ घोषीत करावा, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)