शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील 'या' गावात विहिरीला गरम पाणी; थंड पाणी मिसळल्याशिवाय हातही घालता येईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:21 IST

Gadchiroli Hot Water In Well: हे पाणी एवढे गरम आहे की, त्यात थंड पाणी मिसळल्याशिवाय हातही घालता येत नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांत मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर (ता. अहेरी) : अहेरी तालुक्यातील कमलापूरपासून दोन किलोमीटरवरील ताटीगुडम गावात ४ सप्टेंबरला आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. गावातील एका विहिरीला चक्क गरम पाणी येत असून, त्यामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. तालुका प्रशासन याबाबत अनभिज्ञ असून, भूगर्भातील उष्ण खडकाचा हा परिणाम असू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

हे पाणी एवढे गरम आहे की, त्यात थंड पाणी मिसळल्याशिवाय हातही घालता येत नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांत मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. वैज्ञानिक दृष्टीने याचा योग्य तो निष्कर्ष काढणे गरजेचे आहे.

झाले असे...

सत्यांना मलय्या कटकू (रा. ताटीगुडम) हे शेती करतात. घराजवळच त्यांनी विहीर खोदली आहे. यंदा मुसळधार पाऊस झाल्याने त्यांच्या विहिरीलाही पाणी आले. ४ सप्टेंबरला त्यांच्या विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे निदर्शनास आले. ही वार्ता संपूर्ण परिसरात पोहोचली.

तहसीलदार म्हणतात, मला माहीतच नाही

यासंदर्भात अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मला या घटनेची माहिती नाही, असे सांगितले. यासंदर्भात माहिती घेऊन सांगतो, असे ते म्हणाले. पण, उशिरापर्यंत त्यांनी याविषयी कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.

"दगडांनी बांधलेली विहीर असेल किंवा विहिरीच्या भूगर्भात दगड अधिक असतील तर उन्हामुळे तापमान वाढते व पाणी गरम होते. याशिवाय जमिनीत गंधकाचे प्रमाण अधिक असेल किंवा ज्वालामुखी असेल तर तापमान वाढून पाणी गरम होते."- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरणतज्ज्ञ तथा भूगर्भ अभ्यासक

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीWaterपाणीWellविहीर