शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

वांगेपल्ली पुलावरून अवैध आवागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्रप्रमाणेच तेलंगणा राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : तेलंगणा राज्यातील नागरिकांचा अहेरी तालुक्यात होत आहे प्रवेश

प्रतीक मुधोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागेपल्ली : प्राणहिता नदीवर बांधण्यात आलेल्या वांगेपल्ली घाटावरून तेलंगणा राज्यातून नागरिकांची अवैध ये-जा सुरू आहे. यामुळे अहेरी तालुक्याला कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा राज्याने पुलाचे बांधकाम केले आहे. पुलाचे काम पूर्णत्त्वास आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र पुलाचे लोकार्पण झाले नसल्याने अधिकृतरित्या सार्वजनिक वाहतूक सुरू झाली नाही. तेलंगणा व अहेरी तालुक्यातील नागरिकांचे रोटीबेटी व्यवहार होत असल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांची ये-जा सुरू राहते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्रप्रमाणेच तेलंगणा राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत तेलंगणा राज्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी पथक नसल्याने आरोग्य तपासणी न होताच नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने सीमेवरील प्रत्येक पुलावर पोलीस पथक तैनात केले आहे. त्या ठिकाणी आरोग्य विभागाची चमूसुद्धा कार्यरत राहते. त्यामुळे अवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करता येत नाही. परवानगी घेऊन जिल्ह्यात येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाते. मात्र वांगेपल्ली पुलावरून अशी यंत्रणा नसल्याने नागरिकांची खुलेआम ये-जा सुरू आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस व आरोग्य विभागाचे पथक तैनात करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पथकाची गरजअवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी या ठिकाणी पोलीस व आरोग्य विभागाचे पथक नेमणे आवश्यक आहे. पूर्वी नागरिक नदीमार्गे प्रवास करीत होते. मात्र आता नदीच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने पुलावरून ये-जा करणे हा एकमेव पर्याय आहे. या ठिकाणी पथक नेमल्यास अवैध प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडी