शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

वांगेपल्ली पुलावरून अवैध आवागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्रप्रमाणेच तेलंगणा राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : तेलंगणा राज्यातील नागरिकांचा अहेरी तालुक्यात होत आहे प्रवेश

प्रतीक मुधोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागेपल्ली : प्राणहिता नदीवर बांधण्यात आलेल्या वांगेपल्ली घाटावरून तेलंगणा राज्यातून नागरिकांची अवैध ये-जा सुरू आहे. यामुळे अहेरी तालुक्याला कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा राज्याने पुलाचे बांधकाम केले आहे. पुलाचे काम पूर्णत्त्वास आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र पुलाचे लोकार्पण झाले नसल्याने अधिकृतरित्या सार्वजनिक वाहतूक सुरू झाली नाही. तेलंगणा व अहेरी तालुक्यातील नागरिकांचे रोटीबेटी व्यवहार होत असल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांची ये-जा सुरू राहते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्रप्रमाणेच तेलंगणा राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत तेलंगणा राज्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी पथक नसल्याने आरोग्य तपासणी न होताच नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने सीमेवरील प्रत्येक पुलावर पोलीस पथक तैनात केले आहे. त्या ठिकाणी आरोग्य विभागाची चमूसुद्धा कार्यरत राहते. त्यामुळे अवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करता येत नाही. परवानगी घेऊन जिल्ह्यात येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाते. मात्र वांगेपल्ली पुलावरून अशी यंत्रणा नसल्याने नागरिकांची खुलेआम ये-जा सुरू आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस व आरोग्य विभागाचे पथक तैनात करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पथकाची गरजअवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी या ठिकाणी पोलीस व आरोग्य विभागाचे पथक नेमणे आवश्यक आहे. पूर्वी नागरिक नदीमार्गे प्रवास करीत होते. मात्र आता नदीच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने पुलावरून ये-जा करणे हा एकमेव पर्याय आहे. या ठिकाणी पथक नेमल्यास अवैध प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडी