शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
5
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
6
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
7
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
8
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
9
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
10
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
11
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
12
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
13
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
14
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
15
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
16
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
17
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
18
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
19
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
20
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात मास्क लावायचा नसेल तर लस जरूर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST

गडचिरोली : लसीकरणाबाबत कोणतीही अंधश्रद्धा आणि गैरसमज न बाळगता सर्वांनी कोरोनाची लस टोचून घ्यावी. मी कालच लसीचा दुसरा डोस ...

गडचिरोली : लसीकरणाबाबत कोणतीही अंधश्रद्धा आणि गैरसमज न बाळगता सर्वांनी कोरोनाची लस टोचून घ्यावी. मी कालच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. सर्वांनी लस घेतल्यास भविष्यात आपल्याला मास्क घालायची गरज पडणार नाही, असे मार्गदर्शन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. राज्यात हळूहळू अनलॉक करण्यात येत असल्यामुळे अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पणाच्या वेळी ते बोलत होते. गडचिरोलीलगत नवेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत पाणी पुरवठा योजना व सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण करण्यासाठी ते आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जि.प.सदस्य रामभाऊ मेश्राम, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, डॉ. सुनील मडावी उपस्थित होते.

यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले असले तरी अजून कोरोना गेला असे समजून गाफील राहू नका. कोरोनाला हरवायचे असेल तर मास्क लावणे, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन केल्यास निश्चितच कोरोना हद्दपार करता येईल. लसीकरण केल्यामुळे कोरोना विषाणुचा प्रभाव खूप कमी होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी करण्यास मदत होईल. लस टोचाल तर वाचाल, हे लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील लसीकरण व आरोग्य सुविधांबाबत यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हयातील कोरोना स्थितीबाबतही चर्चा करून लसीकरणाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

(बॉक्स)

आदिवासी बांधवांशी साधला संवाद

सावरगाव येथे काही घरांबाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांशी ना.वडेट्टीवार यांनी गाडीतून उतरून संवाद साधला व तेथील समस्यांबाबत चर्चा केली. गावकऱ्यांनी पाणी प्रश्नाबाबत अडचणी सांगितल्या. लगेच मंत्र्यांनी पाणी पुरवठा विभागाला समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी घरात जाऊन त्यांची विचारपूस केली.

(बॉक्स)

नवेगाव येथे पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

जल जीवन मिशन प्रकल्पांतर्गत नवेगाव-मुरखळा ग्रामपंचायतीमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ३.५ लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे व पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण मंत्र्यांच्या हस्ते झाले. शहरालगत असलेली व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे. भविष्यात दरडोई पाणी पुरवठा वाढविण्याची आवश्यकता पडेल. त्यासाठी आताच नियोजन करा व प्रस्ताव प्रशासनास सादर करा, आपण लोकांना आवश्यक पाणी देऊ, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.