शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शतकोटी वृक्ष लागवडीचे आॅडिट रखडले

By admin | Updated: October 14, 2014 23:18 IST

शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांची तपासणी मोहीम एक महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने संपूर्ण प्रशासन निवडणुकीच्या

देसाईगंज : शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांची तपासणी मोहीम एक महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने संपूर्ण प्रशासन निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहे. त्यामुळे शतकोटी वृक्ष लागवडीच्या आॅडिटचे काम रखडले आहे. सदर कामाला आता दिवाळीनंतरच गती येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. संपूर्ण राज्यात १०० कोटी वृक्षांची लागवड करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात शतकोटी वृक्षलागवड योजनेची अंमलबजावणी केली. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषद, महसूल विभाग, वन विभागाला एका विशिष्ट प्रमाणात वृक्षांची लागवड करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च राज्य शासनाकडून संबंधित विभागाला उपलब्ध करून देण्यात आला. त्याचबरोबर वृक्ष लागवडीची सक्तीही करण्यात आली. आपल्यावर कारवाई होऊ नये यासाठी प्रत्येकच विभागाने उद्दीष्टाएवढे किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात वृक्षांची लागवड केली, असे कागदोपत्री दाखविले. मात्र प्रत्यक्षात फारच कमी प्रमाणात वृक्ष जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने शिक्षकांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची तपासणी मोहीम सुरू केली. ज्या शाळांंमध्ये हरितसेना पथक कार्यरत आहे. या पथकाकडून वृक्ष पाहणीचे काम सुरू करण्यात आले होते. शालेय वेळ वगळून हे काम शिक्षकांना करायचे होते. यामध्ये वृक्ष लागवडीची संख्या, वृक्षांची परिस्थिती, झाडांची उंची, झाडाला लावण्यात आलेले कुंपन, लागवड केलेल्या वृक्षांच्या प्रजाती व गावकऱ्यांनी प्रतिक्रिया तपासली जाणार आहे. वृक्ष तपासणी मोहिमेला सुरूवात झाल्यानंतर अगदी आठ दिवसांतच विधानसभेचे आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळे निवडणुकीच्या कामामध्ये महसूल प्रशासनासह, शिक्षण, वनीकरण, वन विभागाचे कर्मचारी व्यस्त झाले. त्यामुळे तपासणीचे काम थंडावले असल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसानंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे वृक्ष तपासणीचे काम दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतरच सुरू होईल, अशी शक्यता अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. मोहीम रखडल्याने राज्यात नेमकी किती झाडे जिवंत आहेत. याचा अधिकृत आकडा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. (प्रतिनिधी)