शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

जिल्ह्यातील शेकडो शाळांपर्यंत वीज पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:33 IST

जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल ३५० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमांसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना लगतच्या घरातून भाड्याने वीज घ्यावी लागत आहे. विजेअभावी अनेक अडचणी जाणवत आहेत.

ठळक मुद्देसाधने धूळखात : अध्यापनावर होत आहे विपरित परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल ३५० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमांसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना लगतच्या घरातून भाड्याने वीज घ्यावी लागत आहे. विजेअभावी अनेक अडचणी जाणवत आहेत.गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५५३ व नगर परिषदेच्या १८ अशा एकूण १ हजार ५७१ प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये जि. प. च्या १ हजार ५३८ प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक १० तसेच ५ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहेत. गडचिरोली, देसाईगंज नगर पालिकेच्या एकूण १८ शाळांपैकी ५ शाळांमध्ये उच्च प्राथमिक वर्गाच्या शिक्षणाची सुविधा आहे. जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या एकूण १५७१ पैकी १ हजार २१५ शाळांमध्ये विद्युतीकरणाची सुविधा आहे. तर ३५० शाळा अद्यापही विद्युतीकरणापासून दूर आहेत.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळा उघडल्यानंतर सकाळची प्रार्थना, पसायदान व दैनंदिन परिपाठ घेण्यासाठी लाऊडस्पिकरचा वापर करण्यात यावा, अशा सूचना आहेत. ज्या शाळांमध्ये विद्युतीकरणाची सुविधा आहे, अशा शाळांनी लाऊडस्पिकर व साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली आहे. मात्र वीज नसलेल्या तब्बल ३५० पेक्षा अधिक शाळांमध्ये विना लाऊडस्पिकरच्या सहाय्याने सकाळचा परिपाठ घेतल्या जात आहे. वीज नसलेल्या शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी व सराव करण्यासाठी शिक्षकांच्या भ्रमणध्वनी संचाचा वापर केला जात आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेने शाळा विद्युतीकरणासाठी विशेष आर्थिक तरतूद करून जिल्ह्यातील सर्व शाळा विद्युतीकरणातून सोयीसुविधायुक्त कराव्यात, अशी मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे. शाळांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून साधने खरेदी केले आहेत. मात्र ही साधने आता बेकामी ठरले आहेत. शिक्षण विभागाने वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आहे.वर्ग खोल्याही नाहीजिल्ह्यात जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या एकूण १ हजार ५७१ शाळा आहेत. या सर्वच शाळांना इमारती आहेत. मात्र या सर्व शाळा मिळून वर्ग खोल्यांची संख्या १ हजार ३४९ आहे. तब्बल २२२ वर्ग खोल्या शाळांच्या संख्येच्या तुलनेत कमी पडत आहे. या शाळांना तत्काळ स्वतंत्र वर्ग खोल्या निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Schoolशाळाelectricityवीज