शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

कुणबी समाजालाही हवा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:43 IST

लोकसंख्येच्या तुलनेत कुणबी समाजापेक्षा कमी असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मिळाले, पण बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला त्या आरक्षणाचा वाटा मिळाला नसल्यामुळे या समाजातील बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षण : १६ टक्क्यांमध्ये समावेशाची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसंख्येच्या तुलनेत कुणबी समाजापेक्षा कमी असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मिळाले, पण बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला त्या आरक्षणाचा वाटा मिळाला नसल्यामुळे या समाजातील बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षणात आम्हालाही वाटा द्या, अशी मागणी ठिकठिकाणी जोर धरत आहे.यासंदर्भात कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनीही एका पत्रकातून या मागणीला उचलून धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देऊन त्या समाजाला न्याय दिला. या आरक्षणासाठी ५२ आंदोलने व ४० जणांना बळी जावे लागले. परंतू मराठ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करीत असताना कुणबी समाजाला सोबत घेऊनच आंदोलने केली. मराठा नेते कुणबी आणि मराठा आम्ही एकच आहोत, आमच्यात रोटी-बेटीचे व्यवहार चालतात म्हणून आम्हाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करून घ्यावा, अशी मागणी करीत होते. परंतू ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी विरोध केल्याने सरकारने त्यांना एसबीसी प्रवर्गात समावेश करून एकूण ५१ टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून तामिळनाडूच्या धर्तीवर १६ टक्के आरक्षण दिले. परंतू जातीनिहाय जनगणना झालेली नसताना मराठ्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात ३२ टक्के ठरविणे चुकीचे आहे, असे ठाम मत भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रात १०० टक्क्यांपैकी ५२ टक्के ओबीसी, एससी-एसटी २ टक्के आणि मुस्लिम, ब्राह्मण व तत्सम खुल्या प्रवर्गातील जाती पकडून १०० टक्के लोकसंख्या होते. त्यात ३२ टक्के मराठा समाज दाखविणे चुकीचे असल्याचा आरोप वाघरे यांनी केला.मराठा समाजाकडून संपूर्ण राज्यात आंदोलने केली जात असताना मराठवाड्यात सकल मराठा मोर्चा, तर कोकण, खान्देश आणि विदर्भात मराठा-कुणबी मोर्चा अशा पद्धतीचे होर्डिंग लावून या आंदोलनात कुणबी समाजाला समाविष्ठ करून घेण्यात आले होते. मग आता आरक्षणात कुणबी समाजाला वाटा का नाही? असा सवाल कुणबी समाजातील युवकांकडून केला जात आहे.राज्य सरकार सध्या नोकरभरतीचा गवगवा करीत असल्यामुळे अनेक बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतू त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळेल पण आपल्याला नाही, या कल्पनेने कुणबी समाजातील बेरोजगार युवक अस्वस्थ होत आहेत.ही तर फसवणूकआरक्षणासाठी मराठा समाज खरोखरच पात्र आहे का? आणि या समाजाची लोकसंख्या किती हे तपासण्यासाठी तत्कालीन सरकारने राणे समिती गठीत केली होती. परंतू त्या समितीने गडचिरोली जिल्ह्यात मराठा समाजाची १८ हजार कुटुंब असल्याची माहिती प्रशासनामार्फत शासनाला दिली. वास्तविक विदर्भातील जिल्ह्यांत राहणाऱ्या कुणबी समाजाची गणना मराठा समाजात करून राणे समितीने कुणबी समाजाची फसवणूक केली. महाराष्ट्रात होणाऱ्या मेगाभरतीत कुणबी समाजाला मराठा आरक्षणात वाटा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी केली.

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षण