शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

२५०० रुपयांत महिनाभराचा खर्च भागवायचा कसा ? शाळेतील मदतनीसांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:10 IST

Gadchiroli : १७०० कर्मचारी शाळेत आहार शिजविण्याचे कामे करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत गेल्या २० ते २५ वर्षापासून महाराष्ट्रात १,७५,००० स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत. महाराष्ट्रात या कर्मचाऱ्यांना मासिक २५०० रुपये मानधन दिले जाते. साहेब, २५०० रुपयांत महिनाभराचा खर्च भागवायचा कसा? असा सवाल शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी शासनाला केला आहे. याबाबत आयटकच्या वतीने आमदार मसराम यांना २५ फेब्रुवारी रोजी देसाईगंज येथे निवेदन देण्यात आले.

बरीच कामे करूनही महिन्याकाठी फक्त रुपये २५०० मिळतात, तर पांडेचेरी राज्यात १४ हजार रुपये दरमहा, केरळमध्ये १० हजार व तामिळनाडूमध्ये ७८०० रुपये दरमहा याप्रमाणे मानधन दिले जाते. मात्र, राज्यात या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते.

मानधन वाढीची मागणी आयटकचे राज्य महासचिव कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. निवेदन देताना संघटनेचे तालुका संघटक आनंद धाकडे, अध्यक्ष विलास बनसोड, विनोद सयाम, नंदलाल जांभुळे, सुनीता धाकडे, आशा ठाकरे, कुंदा गोटेफोडे, रंजना भजने हजर होते.

कोणकोणती कामे करावे लागतात?या तुटपुंज्या मानधनामध्ये या कर्मचाऱ्यांकडून पोषण आहार तयार करण्याबरोबर शाळा उघडणे, शाळेची देखभाल करणे, स्वच्छता राखणे, जेवणानंतर विद्यार्थ्यांची भांडी थुण्यापासून ते इतरही कामे करावी लागतात.

एक हजार रुपये वाढीचा प्रस्ताव धूळखात

  • राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून १ हजार रुपयांच्या मानधन वाढीचा निर्णय झाला होता.
  • मंत्री व शिक्षण विभागाने वित्त विभागाला प्रति महिना १ हजार रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाला सादर केला होता, तसेच हाच प्रस्ताव २३ जानेवारी २०२५ रोजी अर्थखात्याकडे मंजुरीसाठी परत सादर केला गेला आहे. मात्र, अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची मानधन वाढ दिली गेलेली नाही.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीzpजिल्हा परिषद