शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तलावाचे पाणी मोरीद्वारे घरात

By admin | Updated: September 13, 2014 01:36 IST

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक वार्ड क्रमांक ४ मधील धरमपूर परिसरातील नागरिकांच्या घरात तलावाचे पाणी

अहेरी : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक वार्ड क्रमांक ४ मधील धरमपूर परिसरातील नागरिकांच्या घरात तलावाचे पाणी मोरीद्वारे शिरल्याने येथील नागरिकांच्या अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे या वार्डात असलेला रस्ता पूर्णत: उखडला आहे. मागील वर्षी या वार्डातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. मात्र या समस्येचे निराकरण करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे यंदाही पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.स्थानिक धरमपूर वार्डाला लागूनच लहान तलाव आहे. भरपूर पाऊस झाल्याने यंदा हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावातील पाणी कमी करण्याकरिता प्रशासनाच्यावतीने छोट्या कॅनलच्या ूमाध्यमातून पाणी बाहेर सोडले जात आहे. मात्र सध्य:स्थितीत तलावाचे पाणी बाहेर निघण्यासाठी कोणतेच कॅनल उपलब्ध नाही. परिणामी तलावाचे पाणी या परिसरातील नागरिकांच्या शेतात व घरात शिरत आहे. या पाण्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. पाण्यासह तलावातील कचरा, शेवाळ नागरिकांच्या घरात शिरत असल्याने रोगराई पसरण्याची शक्तता तसेच रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्य:स्थितीत प्रा. लाभसेटवार यांच्या घरासमोरून तलावाचे पाणी वाहत असल्याने या परिसरातील नागरिकांना पाण्याच्या दुर्गंधीचा त्रासही सहन करावा लागत आहे. मागील वर्षीही लाभसेटवार यांच्या घरासमोरून तलावाचे पाणी वाहत होते. परिणामी त्यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळली होती. यंदा पाण्याचा निचरा पूर्ण होण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे वार्डातील रस्ता उखडला आहे. याच वार्डातील पठाण यांच्या घरात पाणी शिरल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरातील भांडी, कपडे व इतर साहित्य वाहून गेले. धरमपूर वार्डातील जवळपास ५० कुटुंबीयांनी आपले घर सोडून वेगळे बस्तान मांडलेले आहेत. मागील चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे या वार्डातील अनेक नागरिकांच्या वस्तूंची नासधूस झाली. या वार्डातील ग्रामपंचायत सदस्य शैलेश पटवर्धन यांनी सदर समस्येबाबत ग्रामपंचात प्रशासनाला सूचना दिल्या. परंतु तब्बल ४ दिवसानंतर ग्रामसेवक व तलाटी यांनी या वार्डाची पाहणी केली. त्यानंतर या वार्डाती कचरा व गाळ काढण्यात अ ाला. परंतु मागील अनेक वर्षांपासून या वार्डात मोठी नाली व स्लॅबड्रेन बांधण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी असतांनाही ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी पावसाळ्या या वार्डातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे या वार्डातील समस्या त्वरित सोडवाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)