शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
2
Thane Municipal Corporation Election 2026 : ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचा तिसरा नगरसेवक बिनविरोध विजयी
3
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
4
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
5
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
6
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
7
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
8
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
9
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
10
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
11
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
12
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
13
जय श्रीराम! अयोध्येत महासागर, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ लाख भाविकांनी घेतले रामलला दर्शन
14
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
15
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
16
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
18
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
19
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
20
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
Daily Top 2Weekly Top 5

७३९ हेक्टरवर होणार फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:34 IST

फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे.

ठळक मुद्दे९९ हजार रोपे : कृषी विभागाचे प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रावर धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील जमीन व वातावरण फळपिकांसाठी लाभदायक असले तरी येथील शेतकरी अजूनपर्यंत फळबागेकडे वळला नसल्याचे दिसून येते. फळबागेमध्ये काही वर्ष आंतरपीक घेता येत असल्याने शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होण्यास मदत होते. येथील शेतकरी फळबागेकडे वळावा, यासाठी कृषी विभागाच्या मार्फत प्रयत्न सुरू आहेत. २०१७-१८ या वर्षात प्रती कृषी सहायक १० हेक्टरचे लक्षांक देण्यात आले होते. त्यानुसार २५३ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी केल्यानंतर २०१ शेतकऱ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यातील ४१ शेतकºयांनी ४२.४८ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे.यावर्षी ३५० हेक्टरवर आंबा, प्रत्येकी ५० हेक्टरवर काजू, चिकू, कागदी लिंबू, आवळा रोपे, प्रत्येकी १० हेक्टरवर सीताफळ, आवळा कलमे, जांभूळ, फणस व बांबू पिकाची लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व थोड्या प्रमाणात मदत उपलब्ध करून दिल्यास शेतकरी फळबागांकडे वळेल, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी आंबा, काजू, चिकू, सिताफळ, काजू, लिंबू, आवळा, जांभूळ, फणस आदी फळांची कलमे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना या कलमांचे कृषी विभागाच्या मार्फत वितरण होणार आहे.२०१८-१९ यावर्षात ७३९ हेक्टरवर ९९ हजार फळझाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्यात सोनापूर, वाकडी, कृष्णनगर, रामगड व कसनसूर येथे शासकीय रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये कलमे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.आंबा पिकाकडे कलगडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन आंबा पिकासाठी योग्य असल्याने आंबा पिकाचे चांगले उत्पादन होत असल्याचा शेतकºयांचा अनुभव आहे. त्यामुळे आंबा पिकाखालील क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी ४२ हेक्टरवर आंबा पिकाची लागवड झाली.