शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

७३९ हेक्टरवर होणार फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:34 IST

फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे.

ठळक मुद्दे९९ हजार रोपे : कृषी विभागाचे प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रावर धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील जमीन व वातावरण फळपिकांसाठी लाभदायक असले तरी येथील शेतकरी अजूनपर्यंत फळबागेकडे वळला नसल्याचे दिसून येते. फळबागेमध्ये काही वर्ष आंतरपीक घेता येत असल्याने शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होण्यास मदत होते. येथील शेतकरी फळबागेकडे वळावा, यासाठी कृषी विभागाच्या मार्फत प्रयत्न सुरू आहेत. २०१७-१८ या वर्षात प्रती कृषी सहायक १० हेक्टरचे लक्षांक देण्यात आले होते. त्यानुसार २५३ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी केल्यानंतर २०१ शेतकऱ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यातील ४१ शेतकºयांनी ४२.४८ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे.यावर्षी ३५० हेक्टरवर आंबा, प्रत्येकी ५० हेक्टरवर काजू, चिकू, कागदी लिंबू, आवळा रोपे, प्रत्येकी १० हेक्टरवर सीताफळ, आवळा कलमे, जांभूळ, फणस व बांबू पिकाची लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व थोड्या प्रमाणात मदत उपलब्ध करून दिल्यास शेतकरी फळबागांकडे वळेल, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी आंबा, काजू, चिकू, सिताफळ, काजू, लिंबू, आवळा, जांभूळ, फणस आदी फळांची कलमे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना या कलमांचे कृषी विभागाच्या मार्फत वितरण होणार आहे.२०१८-१९ यावर्षात ७३९ हेक्टरवर ९९ हजार फळझाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्यात सोनापूर, वाकडी, कृष्णनगर, रामगड व कसनसूर येथे शासकीय रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये कलमे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.आंबा पिकाकडे कलगडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन आंबा पिकासाठी योग्य असल्याने आंबा पिकाचे चांगले उत्पादन होत असल्याचा शेतकºयांचा अनुभव आहे. त्यामुळे आंबा पिकाखालील क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी ४२ हेक्टरवर आंबा पिकाची लागवड झाली.