शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

७३९ हेक्टरवर होणार फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:34 IST

फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे.

ठळक मुद्दे९९ हजार रोपे : कृषी विभागाचे प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रावर धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील जमीन व वातावरण फळपिकांसाठी लाभदायक असले तरी येथील शेतकरी अजूनपर्यंत फळबागेकडे वळला नसल्याचे दिसून येते. फळबागेमध्ये काही वर्ष आंतरपीक घेता येत असल्याने शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होण्यास मदत होते. येथील शेतकरी फळबागेकडे वळावा, यासाठी कृषी विभागाच्या मार्फत प्रयत्न सुरू आहेत. २०१७-१८ या वर्षात प्रती कृषी सहायक १० हेक्टरचे लक्षांक देण्यात आले होते. त्यानुसार २५३ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी केल्यानंतर २०१ शेतकऱ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यातील ४१ शेतकºयांनी ४२.४८ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे.यावर्षी ३५० हेक्टरवर आंबा, प्रत्येकी ५० हेक्टरवर काजू, चिकू, कागदी लिंबू, आवळा रोपे, प्रत्येकी १० हेक्टरवर सीताफळ, आवळा कलमे, जांभूळ, फणस व बांबू पिकाची लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व थोड्या प्रमाणात मदत उपलब्ध करून दिल्यास शेतकरी फळबागांकडे वळेल, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी आंबा, काजू, चिकू, सिताफळ, काजू, लिंबू, आवळा, जांभूळ, फणस आदी फळांची कलमे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना या कलमांचे कृषी विभागाच्या मार्फत वितरण होणार आहे.२०१८-१९ यावर्षात ७३९ हेक्टरवर ९९ हजार फळझाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्यात सोनापूर, वाकडी, कृष्णनगर, रामगड व कसनसूर येथे शासकीय रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये कलमे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.आंबा पिकाकडे कलगडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन आंबा पिकासाठी योग्य असल्याने आंबा पिकाचे चांगले उत्पादन होत असल्याचा शेतकºयांचा अनुभव आहे. त्यामुळे आंबा पिकाखालील क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी ४२ हेक्टरवर आंबा पिकाची लागवड झाली.