शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

१३२ प्रज्ञावंतांचा पदवीने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर, राज्यपालांचे प्रतिनिधी डॉ.सी.डी.माई, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्दे‘गोंडवाना’चा दीक्षांत समारंभ : एसटीआरसीच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित करण्याचे काकोडकर यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी गुरूवारला विद्यापीठाच्या परिसरात प्रशस्त शामियानात पार पडला. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केलेले २१ तसेच सुवर्णपदक प्राप्त ३१ व गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेल्या जवळपास ८० अशा एकूण १३२ प्रज्ञावंतांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर, राज्यपालांचे प्रतिनिधी डॉ.सी.डी.माई, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर विविध विद्या शाखेचे अधीष्ठाता डॉ. एस. बी. रेवतरकर, डॉ. जी. एफ. सूर्या, डॉ. एस. एस. कावळे, डॉ. एस. एम. साकुरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, डॉ.प्रदीप घोरपडे, अजय लोंढे, डॉ.हंसा तोमर, डॉ. अनिल चिताडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. अनिल काकोडकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात विविध विषयात आचार्य पदवी उत्तीर्ण २१ प्रज्ञावंतांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विविध विषयात सुवर्णपदक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या एकूण १११ गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ३१ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी एसटीआरसी व उपकेंद्र उभारणे ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाचा निरंतर वापर हा ग्रामीण भागामध्ये उदरनिर्वाहाच्या संधी निर्माण करू शकतात. त्यामुळे एसटीआरसीच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठात सिलेज इको सिस्टीम सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले, विद्यापीठाने युजीसी १२ (ब) हा दर्जा प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या संदर्भात युजीसीच्या तज्ज्ञ समितीने विद्यापीठाच्या १२ (ब)च्या मुल्यांकनासाठी १८ व १९ डिसेंबर २०१९ रोजी भेट दिली. १२ (ब) चा दर्जा विद्यापीठाला प्राप्त होईल, असा विश्वास डॉ. कल्याणकर यांनी यावेळी व्यक्त केला. प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांमध्ये संशोधन वृत्ती वृध्दींगत होण्यासाठी एसटीआरसीच्या वतीने विविध उपक्रम राबविल्या जात असून यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावत आहेत, असे ते म्हणाले.विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सदर कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध नियोजनबद्ध व वेळेत पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, डॉ.शिल्पा आठवले यांनी केले.कार्यक्रमाला विद्यापीठाचे विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.२१ जणांचा आचार्य पदवीने गौरवगोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील तब्बल २१ जणांनी विविध विषयावर आचार्य पदवी उत्तीर्ण केली. या प्रज्ञावंतांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये सतिश कोला (रसायनशास्त्र), शरद जिचकार (बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅन्ड बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), सीमा सैंदाने (राज्यशास्त्र), राहूल चुटे (राज्यशास्त्र), चन्नागाला सत्यनारायण (ईलेक्ट्रिकल इंजिनिअरींग), शीतल खेकारे (प्राणीशास्त्र), पूजा खापर्डे (प्राणीशास्त्र), भगवान धोटे (राज्यशास्त्र), विलास गायधने (इतिहास), गिरीधर कुनघाडकर (अर्थशास्त्र), पंकज बेंडेवार (अर्थशास्त्र), वर्षा बनकर (रसायनशास्त्र), इशाक खान (गणित), अरूणा शेंडे (जीवशास्त्र), अश्विनी कडू (रसायनशास्त्र), रविकांत मिश्रा (गणित), प्रणव मंडल (रसायनशास्त्र), शहबाज हक (इंग्लिश), राजू पिदुरकर (रसायनशास्त्र), मेघराज दिवसे (रसायनशास्त्र), उज्वला सारडा (वाणिज्य) यांचा समावेश आहे.३१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदानसुवर्णपदक प्राप्त ३१ विद्यार्थ्यांमध्ये विकास आनंदराव मदनकर, कोमल तिवाडे, नुरसब्बा मुबशीरूद्दीन सय्यद, चारू मोरेश्वर बोरकर, श्वेता मधुकर धडसे, जोसेफ विलेश बोर्नवार, दहागावकर कोंडय्या देवीदास, श्वेता राजेंद्रसिंह गौतम, रक्षा रमेश नाकाडे, सचिन अंतराम तोफा, कविता विजय कानडे, भाग्यश्री ज्ञानदेव रहाटे, सुशीला शालिकराव गजभिये, ममता भगवान सारडा, शेख गौशीया ए जहीर, पायल सुरेश मून, चेतना निमदेव आगळे, चेना साहिती सत्यम, रिमा केवलराम मेंढे, सुषमा कामेश्वर प्रजापती, पूजा पद्माकर गंगमवार, अंकिता चंद्रशेखर सपाटे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदर सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ