शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठा करावा. कुरखेडावरून कोरची येथे येणारी विद्युत लाईन कुरखेडा-कोरची रस्त्याच्या कडेला लावावी.

ठळक मुद्देमहाग्रामसभेची मागणी : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे वर पाण्याची शेती संकटात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय व साधने उपलब्ध आहेत, अशा शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु पावसाच्या पाण्यावर शेती करणारे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाग्रामसभेने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठा करावा. कुरखेडावरून कोरची येथे येणारी विद्युत लाईन कुरखेडा-कोरची रस्त्याच्या कडेला लावावी. तोपर्यंत देवरीवरून विद्युत पुरवठा करावा, तालुक्यात कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे कोरची येथे १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करावी, तसेच पाच- पाच पार्इंटचे दोन ट्रान्सफार्मर लावावे. दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने रोजगार हमीची तसेच कुशल, अकुशल कामे मंजूर करावी, तालुक्यातील मसेली, कोटगूल, कोटरा येथे राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा मंजूर कराव्या तसेच कोरची येथे एसबीआयची शाखा उघडावी. तालुक्यात केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. परंतु कव्हरेज वारंवार विस्कळीत होतो. त्यामुळे खासगी कंपन्यांचे टॉवर उभारावे. गावपाड्यांना महसूली गावाचा दर्जा द्यावा, अशी मागणी महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडूराम हलामी, सचिव नरेंद्र सलामे, सहसचिव कुमारी जमकातन, राजाराम नैैताम, कल्पना नैैताम, शीतल नैैताम, सियाराम हलामी, इजामसाय काटेंगे, नंदकिशोर वैरागडे, रूपेश कुमरे, गणेश गावडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली.मागण्यांकडे वेधले लक्षमहाग्रामसभेने केसरी कार्डधारकांना स्वस्त धान्य, शेतकऱ्यांना मोफत वीज, रोहयोतून शेतीची कामे करणे, वनहक्क पट्टे देणे, बोअरवेल देणे, उपजिल्हा रूग्णालय दर्जा व यंत्रसामग्री उपलब्ध करणे आदी मागण्यांकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारagricultureशेती