शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठा करावा. कुरखेडावरून कोरची येथे येणारी विद्युत लाईन कुरखेडा-कोरची रस्त्याच्या कडेला लावावी.

ठळक मुद्देमहाग्रामसभेची मागणी : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे वर पाण्याची शेती संकटात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय व साधने उपलब्ध आहेत, अशा शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु पावसाच्या पाण्यावर शेती करणारे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाग्रामसभेने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठा करावा. कुरखेडावरून कोरची येथे येणारी विद्युत लाईन कुरखेडा-कोरची रस्त्याच्या कडेला लावावी. तोपर्यंत देवरीवरून विद्युत पुरवठा करावा, तालुक्यात कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे कोरची येथे १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करावी, तसेच पाच- पाच पार्इंटचे दोन ट्रान्सफार्मर लावावे. दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने रोजगार हमीची तसेच कुशल, अकुशल कामे मंजूर करावी, तालुक्यातील मसेली, कोटगूल, कोटरा येथे राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा मंजूर कराव्या तसेच कोरची येथे एसबीआयची शाखा उघडावी. तालुक्यात केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. परंतु कव्हरेज वारंवार विस्कळीत होतो. त्यामुळे खासगी कंपन्यांचे टॉवर उभारावे. गावपाड्यांना महसूली गावाचा दर्जा द्यावा, अशी मागणी महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडूराम हलामी, सचिव नरेंद्र सलामे, सहसचिव कुमारी जमकातन, राजाराम नैैताम, कल्पना नैैताम, शीतल नैैताम, सियाराम हलामी, इजामसाय काटेंगे, नंदकिशोर वैरागडे, रूपेश कुमरे, गणेश गावडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली.मागण्यांकडे वेधले लक्षमहाग्रामसभेने केसरी कार्डधारकांना स्वस्त धान्य, शेतकऱ्यांना मोफत वीज, रोहयोतून शेतीची कामे करणे, वनहक्क पट्टे देणे, बोअरवेल देणे, उपजिल्हा रूग्णालय दर्जा व यंत्रसामग्री उपलब्ध करणे आदी मागण्यांकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारagricultureशेती