शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

वर्षभरात जिल्ह्यात चार पटींनी वाढले हृदयरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:28 IST

जीवनशैलीत होत असलेल्या बदलामुळे दिवसेंदिवस हृदयरोगाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या नोंदीनुसार मागील वर्षी जिल्हाभरात हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या केवळ १७६ एवढी होती.

ठळक मुद्दे७३३ रूग्णांची नोंद : व्यसनाधिनता आणि जीवनशैलीतील बदलाने वाढतेय प्रमाण

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जीवनशैलीत होत असलेल्या बदलामुळे दिवसेंदिवस हृदयरोगाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या नोंदीनुसार मागील वर्षी जिल्हाभरात हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या केवळ १७६ एवढी होती. ती यावर्षी ७३३ पर्यंत पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.नागरिकांचे जीवनमान उंचावत चालले आहे, तसतसा हृदयरोगाचा धोका वाढत चालला आहे. ३० वर्षानंतर उच्च रक्तदाब, मधूमेह कर्करोग हे आजार आढळून येत आहेत. मानसिक ताणतणाव यामुळे हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शरीरात चरबीचे प्रमाण वाढल्याने हृदयरोग व उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते. वेळेवर उपचार न झाल्यास उच्च रक्तदाबामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो.३० वर्षावरील नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. छातीत दुखणे, धडधडणे, चालताना दम येणे, धापा टाकणे, घाम येणे, डोके दुखणे, वारंवार चक्कर येणे आदी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ जवळपासच्या रूग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.हृदयरोग टाळण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. तंबाखू, दारू व इतर व्यसनांपासून दूर राहावे, जास्तीचे मिठ, तेलकट पदार्थ खाणे टाळावे, दरदिवशी हलका व्यायाम, प्राणायम करावे, ताणतणावापासून दूर स्वत:ला ठेवण्याचा प्रयत्न करावा. हिरव्या पाल्याभाज्यांचा समावेश करावा. रागावर नियंत्रण ठेवल्यास हृदयरोगावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.जनजागृतीपर मार्गदर्शन शिबिर२९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदयरोग दिन, १ आॅक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व १० आॅक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन आहेत. या सर्वांचे औचित्य साधून हृदयरोग, मानसिक आरोग्य, कर्करोग, तंबाखू नियंत्रण आदींबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. याचा शुभारंभ २९ सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात केला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.नोंदणीनंतर रूग्णांकडे विशेष लक्षएखाद्या व्यक्तीला हृदयरोग असल्याचे निदान झाल्यानंतर त्याची नोंद असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केली जाते. त्याचबरोबर गंभीर स्थितीतील रूग्ण आंतर रूग्ण विभाग किंवा अतिदक्षता विभागात भरती झाल्यानंतर त्याचीही नोंद केली जाते. नोंद झाल्यानंतर संबंधित रूग्णाला जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय किंवा जिल्हा सामान्य रूग्णालयात आवश्यकतेनुसार तपासणीसाठी बोलविले जाते. या रोगाच्या औषधी सर्वच शासकीय रूग्णालयात उपलब्ध आहेत, अशी माहिती असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. सोनाली कुंभारे यांनी दिली आहे.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्य