शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

गोरखनाथ समाजाच्या लोकांची केली आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुपकुमार कमल यांनी आपल्या टीमला सदर झोपड्यांच्या वस्तीमध्ये पाठवून आरोग्य तपासणी करून घेतली. लॉकडाऊनच्या काळात आपण कुठेही जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही गावाला जाऊ शकता, अशा सूचना डॉ.कमल यांनी सर्व कुटुंबांना दिल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे अडकून पडले : यवतमाळ जिल्ह्यातून स्थलांतर

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. अशा स्थितीत चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे विश्वशांती विद्यालयालगतच्या मोकळ्या जागेत तात्पुरत्या झोपड्या बांधून गेल्या १५ ते २० दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील गोरखनाथ समाजाचे ४० ते ५० कुटुंब वास्तव्यास आहेत. या झोपड्यांमधील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या लोकांचा व्यवसाय मंदावला असला तरी त्यांना स्वत:च्या जिल्ह्यातही जाणे शक्य झाले नाही.भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुपकुमार कमल यांनी आपल्या टीमला सदर झोपड्यांच्या वस्तीमध्ये पाठवून आरोग्य तपासणी करून घेतली. लॉकडाऊनच्या काळात आपण कुठेही जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही गावाला जाऊ शकता, अशा सूचना डॉ.कमल यांनी सर्व कुटुंबांना दिल्या आहेत.गोरखनाथ समाजातील ४० ते ५० कुटुंब झोपड्या बांधून आहेत. या झोपड्यांवर ताडपत्रींचे छत आहे. सदर जमात भटकंती असल्याचे सर्वत्र ओळखले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले गोरखनाथ समाजाचे लोक वर्षातून चार महिने आपले नेहमीचे घर सोडून जिल्हाबाहेर जाऊन पारंपरिक व्यवसाय करतात. बेन्टेक्सच्या वस्तू विकणे, कुकर दुरूस्त करणे, झाडू विकणे आदी कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या काही वर्षांपासून या समाजाचे लोक गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी येत आहेत. यंदा चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे झोपड्या बांधून अल्पावधीच्या व्यवसायासाठी गोरखनाथ समाजाचे कुटुंब येथे आले आहेत.सदर कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दारिद्र्याची आहे. विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गात हा समाज मोडतो. दिवाळी नंतर सदर कुटुंबाचे लोक व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करतात. एप्रिल महिन्यात पुन्हा स्वत:च्या जिल्ह्यात परत जातात. कोरोनामुळे या कुटुंबाचा व्यवसाय थंडबस्त्यात आहे.शाळकरी मुलेही कुटुंबासोबतगोरखनाथ समाजाच्या या ५० कुटुंबांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेत असलेले १० ते १५ मुले, मुली भेंडाळा येथे झोपड्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत वास्तव्य करीत आहेत. सदर मुलांनी त्यांच्या मूळ गावातील शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र व्यवसायाच्या निमित्ताने व उदरनिर्वाहासाठी कुटुंबासोबत या शाळकरी मुलांनाही आणावे लागले. परिणामी त्यांची शाळा बुडत आहे, अशी माहिती तेथील कुटुंबांकडून मिळाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य