शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पाण्यासाठी नगरपंचायतीवर धडकला महिलांचा हंडा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:42 IST

अहेरीत आंदोलन : नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांविरोधात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील नगरपंचायतीअंतर्गत प्रभाग क्र. १६ व १७ मध्ये पाण्याची समस्या बिकट आहे. ७ मे रोजी महिलांनी हंडे घेऊन नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.

नगरपंचायत कार्यक्षेत्रात येत असलेल्या प्रभाग क्र.१६ व १७ मौजा चेरपल्ली व गडअहेरी या जवळपास दोनशे पेक्षा अधिक कुटुंबांच्या वस्त्या आहेत. २०१४ पूर्वी नळ जोडणी केलेली होती. गावात दोन हातपंप असून त्यापैकी एक बंद आहे. सन २०२१ पूर्वी महिन्यातून फक्त दहा दिवसच नियमित पिण्याचे पाणी सोडले जात होते. दोन ते अडीच वर्षांपासून मौजा गडअहेरी या गावाला ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय अहेरीमार्फत नियमित पाणी दिले जात नव्हते. नगरपंचायत प्रशासनाला निवेदने देऊन, विनंती करूनसुद्धा पाणी पुरवठा होण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाही. त्यामुळेमंगळवारी संतप्त महिलांनी मोर्चा काढला.

यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सुनीता दुर्गे, लक्ष्मी आत्राम, आकांक्षा ओडरे, अलका मराठे, सुनीता राऊत, सिद्धू वाघाडे, मोनाबाई आयल, साधना मेश्राम, शारदा आत्राम, रोहिणी आयदोल, कमला आत्राम, हिंगोली आत्राम, प्रेमीला आत्राम, कोमल गलबले, सरिमा गलबले, भाग्यश्री आत्राम, संगीता राऊत, लता राऊत, सुरेखा राऊत, संगीमा गलबले राहुल दुर्गे, अॅड. पंकज दहागावकर, कुणाल मेश्राम, भारत गलबले, विनोद दहागावकर, सचिन दुर्गे आदी उपस्थित होते. लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

गडअहेरी भागात व समस्या असल्या ठिकाणी ग्रामीणपाणी पुरवठा कार्यालयामार्फत पाण्याचा पुरवठा केला जाईल. तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत, याकडेही लक्ष आहे. आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.जोरदार- अनिल दाते, मुख्याधिकारी, न.पं.

 

टॅग्स :tumsar-acतुमसरGadchiroliगडचिरोलीwater scarcityपाणी टंचाई