शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा जिल्हा पुराच्या कवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणांचे पाणी वैनगंगा नदीत सोडले जात आहे. भंडारा जिल्ह्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता २३,२८९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र मध्यप्रदेश राज्यातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढतच गेल्याने रविवारी सकाळी पुन्हा दरवाजे उचलून २६,०६५ क्यूमेक्स विसर्ग सुरू होता.

ठळक मुद्दे१९९४ नंतरचा सर्वात मोठा पूर : अनेक गावांमध्ये शिरले पुराचे पाणी, ७०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोसेखुर्द धरणातून रेकॉर्डब्रेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी, गडचिरोली तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी गडचिरोलीतून जाणारे अनेक प्रमुख मार्ग बंद होते. पाण्याचा विसर्ग वाढत चालला असल्याने सोमवारी पुन्हा पूर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणांचे पाणी वैनगंगा नदीत सोडले जात आहे. भंडारा जिल्ह्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता २३,२८९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र मध्यप्रदेश राज्यातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढतच गेल्याने रविवारी सकाळी पुन्हा दरवाजे उचलून २६,०६५ क्यूमेक्स विसर्ग सुरू होता. रविवारी सायंकाळी पुन्हा गोसेखुर्द धरणाचे १३ दरवाजे पाच मीटरने तर २० दरवाजे ४.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून ३०,५८९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी जास्त पाणी सोडण्यात आले. वाढलेले पाणी गडचिरोली पर्यंत सोमवारी पोहोचणार आहे. त्यामुळे पूर पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, गोसेखुर्द धरणाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.१९९४ मध्ये सर्वात मोठा पूर आला होता. त्या पुरानंतर यावर्षीचा सर्वात मोठा पूर आहे. असे वयस्क नागरिकांकडून सांगितले जात आहे. अनेक गावांच्या नदी काठापर्यंत पाणी पोहोचले असल्याने गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागणार आहे. तसेच गावकºयांनी जनावरे मोकळे सोडून दिली आहेत.पुरात अडकलेल्या वृध्द दाम्पत्याला काढलेकुरूड : कोंढाळा येथील लालाजी आडे व त्यांची पत्नी शेतात राहत होते. शेतातील झोपडीत वास्तव्य करीत होते. २९ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या झोपडीला पाण्याने वेढले. गावाकडे येण्याचा प्रयत्न केला. मात्र चारही बाजुने पुराने वेढा घातला होता. त्यामुळे संपूर्ण रात्र झोपडीवर बसून काढली. पुराच्या पाण्यात झोपडीतील साहित्य, कोंबड्या, शेळ्या वाहून गेल्या. दुचाकी पुरातच अडकली आहे. रविवारी आपत्ती व्यवस्थापन पथकाने झोपडीपर्यंत बोट नेऊन लालाजी आडे, त्यांची पत्नी व हिरामण बुराडे यांना पूरातून बाहेर काढले. एसडीओ विशालकुमार मेश्राम, तहसीलदार दीपक बुटे, नायब तहसीलदार आर. डी. नैताम, पोलीस विभागाचे मोहनदास सयाम, राकेश देवेवार, राजेश शेंडे, सिताराम लांजेवार, अशोक कराडे, कृष्ण जुवारे, बोट चालक वैदिक शेख, प्रेमकुमार भगत, वनरक्षक सलिम सय्यद, पोलीस पाटील किरण कुंभलवार, सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार, उमेश राऊत यांनी प्रयत्न केले.देसाईगंजातील ४०० घरांना फटकापुराचे पाणी देसाईगंज शहरातील जवळपास ४०० घरांमध्ये शिरले आहे. यापूर्वी १९९४ मध्ये हनुमान वार्ड पाण्याखाली आला होता. त्यानंतर यावर्षी फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. लाखांदूर मार्गालगत आशिर्वाद कॉलनी व ब्रह्मपुरी मार्गालगत विद्यानगर या नावाने लेआऊट पाडून घरे बांधण्यात आली. या वस्तीला यावर्षीच फटका बसला. त्यामुळे या परिसरात नव्याने घर बांधणाºयांमध्ये असुरक्षततेची भावना निर्माण झाली आहे. १९९४ मध्ये देसाईगंज-लाखांदूर मार्गावरील बैद्यनाथ कारखाना, मारोती राईसमिल, बायपास मार्गावरील हनुमान वार्ड पाण्याखाली आला होता. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नवीन लेआऊट पाडून विकले जात आहेत. नागरिक प्लाट घेतेवेळी पूर परिस्थितीचा विचार करीत नाही. त्यामुळे आपत्तीला तोंड द्यावे लागते. देसाईगंज-आमगाव मार्गालगतच्या हनुमान वार्डातील नवीन वस्तीतील अंदाजे २०० घरे व गांधी वार्डातील सहारे हॉस्पीटलच्या मागील बाजूस असलेल्या नवीन लेआऊटमधील २०० घरे पुराने वेढले आहेत. यातील काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.सावंगी व देसाईगंजातील ५२ कुटुंबांना हलविलेदेसाईगंज तालुक्यातील सावंगी हे गाव अगदी वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. या गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने २० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तसेच देसाईगंज शहरातील हनुमान वार्डातील धर्मपुरी परिसरातही पुराचे पाणी जमा झाले. त्यामुळे ३२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊस