शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

आरमाेरी तालुक्यात २३१.८० हेक्टर क्षेत्रात हाेणार भुईमूग पिकाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 23:15 IST

नद्यांच्या किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील कढाेली, सावरखेडा, कराडी, सोनेरांगी, खरकाडा, भगवानपूर, वाढोणा या गावांत तर आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, करपडा, मोहझरी, सुकाळा या नदीकाठाच्या गावांत मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. भुईमूग हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या तेलबियांची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे पीक असून, काळाच्या ओघात या पिकाचे महत्त्वदेखील वाढत आहे. या पिकाला निरनिराळ्या हवामानात जुळून घेण्याची क्षमता असल्याने या पिकाचे दिवसेंदिवस लागवड क्षेत्रदेखील वाढत आहे. सन २०२१ -२२ या वर्षात रब्बी हंगामात आरमोरी तालुक्यात भुईमूग पिकाचे लागवड क्षेत्र २३१.८०  हेक्टर क्षेत्र असून, यंदा गडचिराेली जिल्ह्यातदेखील भुईमुगाचा पेरा वाढणार आहे.यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने बाह्य मशागतीच्या कामाला उशीर झाला. १५ ऑक्टोबरपर्यंत पेरणी झाल्यास  फुलाचा कडाक्याच्या थंडीचा काळ सापडत नाही त्यामुळे चांगले उत्पादन येते. पण या वर्षात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे रबी पिकाला लागवडीसाठी उशीर झाला. या वर्षात आक्टोबर महिना संपत आला तरी अजूनपर्यंत काही शेतकरी बाह्य मशागतीच्या नांगरणीचे काम करीत आहेत. उशीर झाला असला तरी या उत्पादनात काही फरक पडणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.मध्यम, चांगल्या,  भुसभुशीत चिकण मातीच्या जमिनीत हे पीक चांगले येत असल्याने या स्वरूपाच्या मातीचा नदीकाठ खोब्रागडी, वैलोचना, सती नदीला लाभला. या तिन्ही नद्या कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी  तालुक्यांतील काही गावांजवळून वाहतात. या नद्यांच्या किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील कढाेली, सावरखेडा, कराडी, सोनेरांगी, खरकाडा, भगवानपूर, वाढोणा या गावांत तर आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, करपडा, मोहझरी, सुकाळा या नदीकाठाच्या गावांत मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते.भुईमूग हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या तेलबियांची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेतकऱ्याला चांगला भाव मिळत असून, भुईमूग उत्पादक शेतकरी आता आर्थिक उन्नतीकडे वाटचाल करत आहेत, म्हणून या पीक पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. 

शेतकऱ्यांनी परंपरागत भुईमुगाचे बियाणे न वापरता सुधारित वाण तसेच टपोरे दाण्यांचे बियाणे वापरल्यास उत्पादन  भरघोस येते. म्हणून शेतकऱ्यांनी आता भुईमुगाच्या नव्या शेतीकडे वळावे. या बियांना बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च भरून तर निघतेच, शिवाय शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धीदेखील होते.- जोत्स्ना घरत, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी