शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

आरमाेरी तालुक्यात २३१.८० हेक्टर क्षेत्रात हाेणार भुईमूग पिकाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 23:15 IST

नद्यांच्या किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील कढाेली, सावरखेडा, कराडी, सोनेरांगी, खरकाडा, भगवानपूर, वाढोणा या गावांत तर आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, करपडा, मोहझरी, सुकाळा या नदीकाठाच्या गावांत मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. भुईमूग हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या तेलबियांची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे पीक असून, काळाच्या ओघात या पिकाचे महत्त्वदेखील वाढत आहे. या पिकाला निरनिराळ्या हवामानात जुळून घेण्याची क्षमता असल्याने या पिकाचे दिवसेंदिवस लागवड क्षेत्रदेखील वाढत आहे. सन २०२१ -२२ या वर्षात रब्बी हंगामात आरमोरी तालुक्यात भुईमूग पिकाचे लागवड क्षेत्र २३१.८०  हेक्टर क्षेत्र असून, यंदा गडचिराेली जिल्ह्यातदेखील भुईमुगाचा पेरा वाढणार आहे.यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने बाह्य मशागतीच्या कामाला उशीर झाला. १५ ऑक्टोबरपर्यंत पेरणी झाल्यास  फुलाचा कडाक्याच्या थंडीचा काळ सापडत नाही त्यामुळे चांगले उत्पादन येते. पण या वर्षात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे रबी पिकाला लागवडीसाठी उशीर झाला. या वर्षात आक्टोबर महिना संपत आला तरी अजूनपर्यंत काही शेतकरी बाह्य मशागतीच्या नांगरणीचे काम करीत आहेत. उशीर झाला असला तरी या उत्पादनात काही फरक पडणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.मध्यम, चांगल्या,  भुसभुशीत चिकण मातीच्या जमिनीत हे पीक चांगले येत असल्याने या स्वरूपाच्या मातीचा नदीकाठ खोब्रागडी, वैलोचना, सती नदीला लाभला. या तिन्ही नद्या कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी  तालुक्यांतील काही गावांजवळून वाहतात. या नद्यांच्या किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील कढाेली, सावरखेडा, कराडी, सोनेरांगी, खरकाडा, भगवानपूर, वाढोणा या गावांत तर आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, करपडा, मोहझरी, सुकाळा या नदीकाठाच्या गावांत मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते.भुईमूग हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या तेलबियांची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेतकऱ्याला चांगला भाव मिळत असून, भुईमूग उत्पादक शेतकरी आता आर्थिक उन्नतीकडे वाटचाल करत आहेत, म्हणून या पीक पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. 

शेतकऱ्यांनी परंपरागत भुईमुगाचे बियाणे न वापरता सुधारित वाण तसेच टपोरे दाण्यांचे बियाणे वापरल्यास उत्पादन  भरघोस येते. म्हणून शेतकऱ्यांनी आता भुईमुगाच्या नव्या शेतीकडे वळावे. या बियांना बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च भरून तर निघतेच, शिवाय शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धीदेखील होते.- जोत्स्ना घरत, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी