शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

कोरेपल्लीत ४५ गावांची ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:57 PM

अहेरी तालुक्यातील ४५ गावांची संयुक्त ग्रामसभा कोरेपल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत गावांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देविकासावर चर्चा : पेसा व वनकायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी तालुक्यातील ४५ गावांची संयुक्त ग्रामसभा कोरेपल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत गावांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.सभेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.लालसू नोगोटी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, माजी सरपंच सांभय्या करपेत, कैलास कोरेत, राजारामचे सरपंच विनायक आलाम, माजी सरपंच भगवान मडावी, वेडमपल्लीचे उपसरपंच मांता पोरतेट, माजी सरपंच सदू पेंदाम, अहेरी तालुका ग्रामसभा प्रतिनिधी तिरूपती कुळमेथे, सतीश सडमेक, बाजीराव तलांडी, शंकर नैताम, जितू गड्डमवार, नारायण चालुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट म्हणाले, भारतीय संविधानात आदिवासाींकरिता विविध घटनात्मक तरतूदी आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास करण्यासाठी पेसा कायदा, वनाधिकार कायदा यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आदिवासी बांधवांनी अन्यायाच्या प्रतिकारासाठी संघटित व्हावे, असे मार्गदर्शन केले.अ‍ॅड.लालसू नोगोटी यांनी भारतीय घटनेतील सातव्या अनुसूचीनुसार अभ्यासक्रमात गोंडी भाषेचा समावेश करावा, वनविभागाने पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले. सांभय्या करपेत यांनी गोंडी धर्म संस्कृतीविषयी मार्गदर्शन केले. कैलास कोरेत यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.संचालन सरपंच बालाजी गावडे, प्रास्ताविक कमलापूरचे उपसरपंच शंकर आत्राम तर आभार भूमक भगवान मडावी यांनी मानले. यावेळी गाव विकास व विविध योजनांबाबत चर्चा झाली.