शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

राज्यातील दारूबंदीच्या तीनही जिल्ह्यांना शासनाने सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 14:43 IST

संपूर्ण राज्यात दारूबंदी असणारे विदर्भातील केवळ तीन जिल्हे आहेत. पण या तीनही जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) आपल्या अधिकाऱ्यांची पदेच भरलेली नाहीत. त्यामुळे तीनही जिल्ह्यात या विभागाकडून केल्या जाणाऱ्या दारूबंदीच्या कारवाया ठप्प पडल्या असून दारूबंदीची संपूर्ण जबाबदारी पोलीस विभागावर येऊन पडली आहे.

ठळक मुद्देएक्साईजमध्ये अधिकारीच नाही विभागाची अवस्था हात छाटल्यासारखी

मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : संपूर्ण राज्यात दारूबंदी असणारे विदर्भातील केवळ तीन जिल्हे आहेत. पण या तीनही जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) आपल्या अधिकाऱ्यांची पदेच भरलेली नाहीत. त्यामुळे तीनही जिल्ह्यात या विभागाकडून केल्या जाणाऱ्या दारूबंदीच्या कारवाया ठप्प पडल्या असून दारूबंदीची संपूर्ण जबाबदारी पोलीस विभागावर येऊन पडली आहे.महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यासह नक्षलग्रस्त गडचिरोली आणि अलिकडे चंद्रपूर या तीन जिल्ह्यात राज्य शासनाने दारूबंदी लागू केली. पण दारूसंबंधी कारवाया करण्याची मुख्य जबाबदारी असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हात मात्र या तीनही जिल्ह्यात छाटण्यात आले आहेत. प्रत्यक्ष कारवाई करणारे निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची ८० टक्के पदे या जिल्ह्यात रिक्त आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यातून येणाऱ्या दारूसह मध्यप्रदेश, छत्तीसगड किंवा तेलंगणा या राज्यातून येणाऱ्या हलक्या दर्जाच्या दारूला, हातभट्टीच्या दारूला रोखणे या विभागाला कठीण झाले आहे.अधिकृत मद्यविक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचा हिशेब ठेवण्यासोबतच दारूबंदीच्या जिल्ह्यात अनधिकृतपणे होणारी मद्यविक्री, मद्यनिर्मिती, साठा आणि वाहतूक यावर आळा घालणे हीसुद्धा या विभागाची महत्वाची जबाबदारी आहे. पण राज्य शासनाने अधिकाºयांची पदभरतीच केली नसल्यामुळे तीनही जिल्ह्यात हा विभाग नावापुरताच शिल्लक आहे.विशेष म्हणजे या विभागात राज्यभरातच अधिकाऱ्यांची कमतरता आहे. तरीही दारूबंदीच्या जिल्ह्यांपेक्षा इतर जिल्ह्यात रिक्त पदांची स्थिती तेवढी गंभीर नाही. त्यामुळे दारूबंदीच्या जिल्ह्यातच अधिकाऱ्यांची रिक्त पदे ठेवण्यामागे नेमके कोणते कारण आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य सीमा खुल्यागडचिरोली जिल्ह्याला छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याची तर चंद्रपूरला केवळ तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. त्या राज्यांतून या जिल्ह्यात मद्याची आयात करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण कोणत्याही मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नाका नाही. गोंदियासारख्या दारूबंदी नसणाऱ्या जिल्ह्यात या विभागाचे राज्य सीमांवर तीन नाके असताना दारूबंदी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये एकही नाका नसणे यावरून दारूबंदीच्या अंमलबजावणीकडे हा विभाग किती गांभिर्याने पाहतो हे लक्षात येते.अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामावर परिणाम झाला आहे. दारूबंदीच्या जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण जास्त आहे हे खरे आहे. ही पदे भरणे राज्य शासनाच्या अखत्यारित आहेत. वर्ग ४ ची पदे भरणे आमच्या हाती आहे ती पदे भरली आहेत. पण अधिकारी असल्याशिवाय कनिष्ठ कर्मचारी काही करू शकत नाहीत.- उषा वर्मा, उपायुक्त,राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूर

टॅग्स :liquor banदारूबंदी