शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

तेलंगणच्या प्रकल्पासाठी राज्यपालांचा दबाव; सरकार सुस्त

By admin | Updated: February 25, 2016 01:11 IST

तेलंगण सीमेलगत महाराष्ट्राला लागून तेलंगण सरकार चार सिंचन प्रकल्पाचे काम रेटून नेत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून या कामाला पूर्ण सहकार्य मिळत असल्यामुळे ....

काँग्रेसचा आरोप : पालकमंत्री कामात फेल; मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकत्व घ्यावेगडचिरोली : तेलंगण सीमेलगत महाराष्ट्राला लागून तेलंगण सरकार चार सिंचन प्रकल्पाचे काम रेटून नेत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून या कामाला पूर्ण सहकार्य मिळत असल्यामुळे भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकार या प्रश्नावर गप्प आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधी असूनही या क्षेत्राची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. डॉ. उसेंडी म्हणाले, तेलंगणा सरकारच्या वतीने मेडिगट्टा-कालेश्वर, देवलवाडा, कन्यापल्ली व चव्हेला आदी चार सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. तेलंगणाचे रहिवासी असलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांची मर्जी सांभाळण्यासाठी तेलंगण सरकारच्या या प्रकल्पाबाबत केंद्र व महाराष्ट्र सरकार गप्प बसले आहे. तेलंगणा सरकारच्या मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील २१ गावे बुडणार असून ३० हजार लोक विस्थापीत होणार आहे. तेलंगणा सरकारच्या सिंचन प्रकल्पामुळे अहेरी उपविभागातील पाच हजार हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जाणार आहे. महाराष्ट्र सरकारला विश्वासात न घेता तेलंगण सरकारकडून प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासह खासदार, आमदार याबाबत मौन बाळगून आहेत, अशी टिका डॉ. उसेंडी यांनी केली. बुडीत क्षेत्रात जाणारी सर्व गावे ही अनुसूचित क्षेत्रातील असून या गावांमध्ये पेसा कायदा लागू झाला आहे. त्यामुळे या गावातून जमीन, पाणी व इतर संपत्ती संपादीत करण्यासाठी ग्रामसभांची मान्यता असणे आवश्यक आहे. तसे राज्यपालांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद आहे. मात्र पेसा कायद्याच्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. खुद्द महाराष्ट्राचे राज्यपाल हेच भारतीय संविधानाचा भंग करीत आहेत, असा गंभीर आरोप डॉ. उसेंडी यांनी केला.तत्कालीन काँग्रेस व राकाँ सरकारच्या काळात जिल्ह्यात मंजूर झालेल्या सिंचन प्रकल्पाचे काम चौकशीच्या नावाखाली विद्यमान सरकारने थांबविले आहे. भाजप सत्ताधारी व लोकप्रतिनिधीच्या दुटप्पी भूमिकेमुळे जिल्ह्याचा विकास रखडला आहे. भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या संघटनांचा आवाज पोलीस बळाचा वापर करून दडपल्या जात आहे. एकूणच भाजपप्रणित सरकारच्या काळात जिल्ह्यासह अहेरी विधानसभा क्षेत्राची परिस्थिती अतिशय भिषणावह झाली आहे. याला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हेच जबाबदार आहे, असे डॉ. उसेंडी म्हणाले. पत्रपरिषदेला हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, भावना वानखेडे, सतीश विधाते, महेंद्र ब्राह्मणवाडे हजर होते. (प्रतिनिधी)