शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
4
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
5
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
6
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
7
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
8
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
9
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
10
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
11
Parasocial: केंब्रिज डिक्शनरीचा मोठा निर्णय! २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' ठरला 'पॅरासोशल'
12
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
13
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
14
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
15
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
16
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
17
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
18
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
19
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
20
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणच्या प्रकल्पासाठी राज्यपालांचा दबाव; सरकार सुस्त

By admin | Updated: February 25, 2016 01:11 IST

तेलंगण सीमेलगत महाराष्ट्राला लागून तेलंगण सरकार चार सिंचन प्रकल्पाचे काम रेटून नेत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून या कामाला पूर्ण सहकार्य मिळत असल्यामुळे ....

काँग्रेसचा आरोप : पालकमंत्री कामात फेल; मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकत्व घ्यावेगडचिरोली : तेलंगण सीमेलगत महाराष्ट्राला लागून तेलंगण सरकार चार सिंचन प्रकल्पाचे काम रेटून नेत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून या कामाला पूर्ण सहकार्य मिळत असल्यामुळे भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकार या प्रश्नावर गप्प आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधी असूनही या क्षेत्राची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. डॉ. उसेंडी म्हणाले, तेलंगणा सरकारच्या वतीने मेडिगट्टा-कालेश्वर, देवलवाडा, कन्यापल्ली व चव्हेला आदी चार सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. तेलंगणाचे रहिवासी असलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांची मर्जी सांभाळण्यासाठी तेलंगण सरकारच्या या प्रकल्पाबाबत केंद्र व महाराष्ट्र सरकार गप्प बसले आहे. तेलंगणा सरकारच्या मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील २१ गावे बुडणार असून ३० हजार लोक विस्थापीत होणार आहे. तेलंगणा सरकारच्या सिंचन प्रकल्पामुळे अहेरी उपविभागातील पाच हजार हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जाणार आहे. महाराष्ट्र सरकारला विश्वासात न घेता तेलंगण सरकारकडून प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासह खासदार, आमदार याबाबत मौन बाळगून आहेत, अशी टिका डॉ. उसेंडी यांनी केली. बुडीत क्षेत्रात जाणारी सर्व गावे ही अनुसूचित क्षेत्रातील असून या गावांमध्ये पेसा कायदा लागू झाला आहे. त्यामुळे या गावातून जमीन, पाणी व इतर संपत्ती संपादीत करण्यासाठी ग्रामसभांची मान्यता असणे आवश्यक आहे. तसे राज्यपालांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद आहे. मात्र पेसा कायद्याच्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. खुद्द महाराष्ट्राचे राज्यपाल हेच भारतीय संविधानाचा भंग करीत आहेत, असा गंभीर आरोप डॉ. उसेंडी यांनी केला.तत्कालीन काँग्रेस व राकाँ सरकारच्या काळात जिल्ह्यात मंजूर झालेल्या सिंचन प्रकल्पाचे काम चौकशीच्या नावाखाली विद्यमान सरकारने थांबविले आहे. भाजप सत्ताधारी व लोकप्रतिनिधीच्या दुटप्पी भूमिकेमुळे जिल्ह्याचा विकास रखडला आहे. भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या संघटनांचा आवाज पोलीस बळाचा वापर करून दडपल्या जात आहे. एकूणच भाजपप्रणित सरकारच्या काळात जिल्ह्यासह अहेरी विधानसभा क्षेत्राची परिस्थिती अतिशय भिषणावह झाली आहे. याला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हेच जबाबदार आहे, असे डॉ. उसेंडी म्हणाले. पत्रपरिषदेला हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, भावना वानखेडे, सतीश विधाते, महेंद्र ब्राह्मणवाडे हजर होते. (प्रतिनिधी)