शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

वसतीगृहातील अवघ्या २४ विद्यार्थ्यांसाठी हवी ४००० चौरस फूट जागा; जाचक अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 17:49 IST

वसतीगृहासाठी एवढी जागा उपलब्ध होणे अशक्य झाल्यामुळे राज्यभरातील मागासवर्गीयांची खासगी वसतीगृहे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअन्यायकारक परिपत्रक रद्द करा, संस्थाचालकांची मागणी

गडचिरोली : सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानातून स्वयंसेवी संस्थांद्वारे मागासवर्गीय मुला-मुलींसाठी वसतीगृहे चालविली जातात; पण दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात काढलेल्या एका परिपत्रकामुळे सध्या राज्यभरातील अनुदानित वसतीगृहे चालविणाऱ्या संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यात विद्यार्थीनिहाय पाडलेल्या टप्प्यांमध्ये वाजवीपेक्षा कितीतरी जास्त जागेची अट टाकण्यात आली आहे. वसतीगृहासाठी एवढी जागा उपलब्ध होणे अशक्य झाल्यामुळे राज्यभरातील मागासवर्गीयांची खासगी वसतीगृहे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनुदानित वसतीगृहांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, ओबीसी व इतर प्रवर्गातील विद्यार्थी निवासी राहून विविध संस्थेच्या शाळेत शिक्षण घेत असतात. मात्र, सामाजिक न्याय विभागाच्या ९ डिसेंबर २०१९ च्या परिपत्रकानुसार २४ विद्यार्थ्यांची मान्यता असलेल्या वसतीगृहासाठी किमान ४ हजार चौरस फुटांची जागा आवश्यक करण्यात आली आहे. याशिवाय ४८ विद्यार्थ्यांसाठी ६ हजार चौरस फूट, ७५ विद्यार्थ्यांसाठी ९१२० चौरस फूट, तर १०० विद्यार्थी संख्येसाठी ११ हजार २०० चौरस फूट जागा आवश्यक करण्यात आली आहे. या जागेत निवासगृह, कार्यालय, स्वयंपाकघर, भोजनकक्ष, कोठीगृह, बहुउद्देशीय कक्ष, अधीक्षिका निवासस्थान, चौकीदार निवासस्थान, प्रसाधनगृह, पॅसेज व जिना आदी बाबींचा समावेश राहणार आहे.

शहरी भागातील किरायाचे दर विचारात घेता शासनाकडून मिळणाऱ्या परिपोषण अनुदानापेक्षा इमारत भाडेच जास्त होते. आश्रमशाळांमध्ये त्यांच्याच कॅम्पसमध्ये वसतीगृहे आहेत. तरीही त्यांच्यासाठी एवढ्या जागेचा नियम नाही. मग अनुदानित वसतीगृहांसाठीच हा वेगळा नियम कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ते अन्यायकारक परिपत्रक रद्द करून मागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त करावा, अशी मागणी गडचिरोलीतील आदिवासी सेवक घनश्याम मडावी यांनी केली आहे.

राज्यभरातील एक लाख विद्यार्थ्यांची अडचण

वास्तविक शासनाच्या १९५९ ते १९९८ पर्यंत काढलेल्या सर्व नियमांमध्ये वसतीगृहासाठी प्रतिविद्यार्थी ५० ते ५५ फूट जागा पुरेशी असल्याचे नमूद केले आहे. असे असताना डिसेंबर २०१९ च्या परिपत्रकामुळे राज्यभरातील वसतीगृहांचे अनुदान थांबविण्यात आले आहे. कोरोनाकाळानंतर आता सर्व शैक्षणिक संस्था सुरू झाल्यामुळे विद्यार्थी वसतीगृहात राहण्यासाठी येत आहेत; पण शासनाच्या परिपत्रकाची पूर्तता करू शकत नसल्यामुळे खासगी अनुदानित वसतीगृहांत त्यांना ठेवण्यासाठी पेच निर्माण झाला आहे. अशात राज्यभरातील एक लाख मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांपुढे राहायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र