शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वसतीगृहातील अवघ्या २४ विद्यार्थ्यांसाठी हवी ४००० चौरस फूट जागा; जाचक अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 17:49 IST

वसतीगृहासाठी एवढी जागा उपलब्ध होणे अशक्य झाल्यामुळे राज्यभरातील मागासवर्गीयांची खासगी वसतीगृहे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअन्यायकारक परिपत्रक रद्द करा, संस्थाचालकांची मागणी

गडचिरोली : सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानातून स्वयंसेवी संस्थांद्वारे मागासवर्गीय मुला-मुलींसाठी वसतीगृहे चालविली जातात; पण दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात काढलेल्या एका परिपत्रकामुळे सध्या राज्यभरातील अनुदानित वसतीगृहे चालविणाऱ्या संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यात विद्यार्थीनिहाय पाडलेल्या टप्प्यांमध्ये वाजवीपेक्षा कितीतरी जास्त जागेची अट टाकण्यात आली आहे. वसतीगृहासाठी एवढी जागा उपलब्ध होणे अशक्य झाल्यामुळे राज्यभरातील मागासवर्गीयांची खासगी वसतीगृहे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनुदानित वसतीगृहांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, ओबीसी व इतर प्रवर्गातील विद्यार्थी निवासी राहून विविध संस्थेच्या शाळेत शिक्षण घेत असतात. मात्र, सामाजिक न्याय विभागाच्या ९ डिसेंबर २०१९ च्या परिपत्रकानुसार २४ विद्यार्थ्यांची मान्यता असलेल्या वसतीगृहासाठी किमान ४ हजार चौरस फुटांची जागा आवश्यक करण्यात आली आहे. याशिवाय ४८ विद्यार्थ्यांसाठी ६ हजार चौरस फूट, ७५ विद्यार्थ्यांसाठी ९१२० चौरस फूट, तर १०० विद्यार्थी संख्येसाठी ११ हजार २०० चौरस फूट जागा आवश्यक करण्यात आली आहे. या जागेत निवासगृह, कार्यालय, स्वयंपाकघर, भोजनकक्ष, कोठीगृह, बहुउद्देशीय कक्ष, अधीक्षिका निवासस्थान, चौकीदार निवासस्थान, प्रसाधनगृह, पॅसेज व जिना आदी बाबींचा समावेश राहणार आहे.

शहरी भागातील किरायाचे दर विचारात घेता शासनाकडून मिळणाऱ्या परिपोषण अनुदानापेक्षा इमारत भाडेच जास्त होते. आश्रमशाळांमध्ये त्यांच्याच कॅम्पसमध्ये वसतीगृहे आहेत. तरीही त्यांच्यासाठी एवढ्या जागेचा नियम नाही. मग अनुदानित वसतीगृहांसाठीच हा वेगळा नियम कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ते अन्यायकारक परिपत्रक रद्द करून मागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त करावा, अशी मागणी गडचिरोलीतील आदिवासी सेवक घनश्याम मडावी यांनी केली आहे.

राज्यभरातील एक लाख विद्यार्थ्यांची अडचण

वास्तविक शासनाच्या १९५९ ते १९९८ पर्यंत काढलेल्या सर्व नियमांमध्ये वसतीगृहासाठी प्रतिविद्यार्थी ५० ते ५५ फूट जागा पुरेशी असल्याचे नमूद केले आहे. असे असताना डिसेंबर २०१९ च्या परिपत्रकामुळे राज्यभरातील वसतीगृहांचे अनुदान थांबविण्यात आले आहे. कोरोनाकाळानंतर आता सर्व शैक्षणिक संस्था सुरू झाल्यामुळे विद्यार्थी वसतीगृहात राहण्यासाठी येत आहेत; पण शासनाच्या परिपत्रकाची पूर्तता करू शकत नसल्यामुळे खासगी अनुदानित वसतीगृहांत त्यांना ठेवण्यासाठी पेच निर्माण झाला आहे. अशात राज्यभरातील एक लाख मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांपुढे राहायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र